शहरं
Join us  
Trending Stories
1
आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 
2
“वरळी विकासापासून वंचित, आदित्य ठाकरेंचा परतीचा प्रवास सुरु”; शिंदे गटाची खरमरीत टीका
3
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
4
अजित पवारांच्या आमदाराची मोठी घोषणा; तिसऱ्या आघाडीत प्रवेश, तिकीटही मिळाले
5
"मान ताठ करुन फिरेल असा..."; युगेंद्र पवारांच्या आव्हानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
वरळीत तिरंगी सामना रंगणार, शिंदेगट आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरांना उतरवणार?
7
पुण्याच्या मैदानात Mitchell Santner ची हवा; पहिल्या डावात टीम इंडियानं केल्या फक्त १५६ धावा
8
Reliance Bonus Share : Reliance Industries देतेय एकावर एक शेअर फ्री; गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
9
“आदित्य ठाकरेंविरोधात एकनाथ शिंदेंनी स्वतः उभे राहावे किंवा जय शाहांनाच आणावे”: संजय राऊत
10
जळगावमध्ये गेल्या विधानसभेत विरोधात, आता सोबत करताहेत प्रचार
11
Girish Mahajan : "सर्व बंडखोरांची समजूत घालू, जिल्ह्यात एकाही ठिकाणी बंडखोरी होणार नाही"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
13
अजित पवारांचा धूमधडाका; भाजपाच्या ३ बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश अन् उमेदवारीही केली जाहीर
14
बापरे! बँकेच्या लॉकरमधून ४० लाखांचे दागिने गायब; फोन येताच महिलेला बसला मोठा धक्का
15
पोलीस कर्मचारी क्रिकेट खेळण्यात व्यस्त, इकडे चौकीतून हातकड्यांसह चोरट्याने काढला पळ
16
"...'तेव्हा' यांनी किती खोके दिले होते, हे मला माहीत आहे"; अमित ठाकरेंचा उद्धव-आदित्यचं नाव न घेता टोला!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
18
जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!
19
EPFO मध्ये मोठ्या बदलांची तयारी, अधिक बचतीचा मार्ग होणार मोकळा, सरकारचा हेतू काय?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : होऊ दे खर्च, बारा लाखांनी वाढली खर्चाची मर्यादा; उमेदवारांना यापूर्वी होती २८ लाखांचीच मुभा

नागपूर जिल्हा परिषदेतील विरोधक कार्यकारी अभियंत्यावर संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:53 AM

पावसाळा लागायला १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यात पाणी टंचाईच्या कामाचा पत्ता नाही, करारनामे अपूर्ण आहे, यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यांच्या ढिसाळ धोरणामुळेच ग्रामीण भाग पाण्यासाठी तहानलेला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी केला.

ठळक मुद्दे१५ दिवस शिल्लक असताना टंचाईच्या कामाला सुरुवात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाळा लागायला १५ दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यात पाणी टंचाईच्या कामाचा पत्ता नाही, करारनामे अपूर्ण आहे, यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चुकीची उत्तरे देऊन दिशाभूल करीत आहे. त्यांच्या ढिसाळ धोरणामुळेच ग्रामीण भाग पाण्यासाठी तहानलेला असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी केला.बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीची बैठकीत निधान यांनी पाणी पुरवठा विभागाची चांगलीच खरडपट्टी काढली. तीन दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास विरोधी बाकावरील सर्व सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटून अभियंत्याना हटविण्यासंदर्भांत निवेदन देतील. जिल्ह्यात दरवर्षी भेडसावणारी पाण्याची टंचाई लक्षात घेता, विभागाने पूर्वीच याचे नियोजन करायला हवे होते. यावर अभियंता टाकळीकर यांना विचारणा केली असता टोलवाटोलवीचे उत्तर देतात. १५ दिवसात कामे न झाल्यास टंचाईचे नियोजन पूर्णत: फिस्कटेल, याला सर्वस्वी सत्ता पक्ष जबाबदार राहील, असेही निधान म्हणाले. सभेदरम्यान, तीर्थक्षेत्र कामामध्ये गैरव्यवहाराचा आरोप सदस्य नाना कंभाले यांनी लावला. तीर्थक्षेत्राची कामे भाजपाच्या काळात अंदाजपत्रक आणि नियमात राहूनच झाली आहे. त्यात कुठल्याही प्रकारची अनियमितता नाही, असा पलटवार करून सभागृहात कंभाले यांचा आरोप सुद्धा निधान यांनी खोडून लावला. मात्र, या कामांवर चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याची भूमिका अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी घेतली.कोरोनाकाळात जिल्ह्यातील काही कंपन्या सुरू झाल्यात. असंख्य कामगार कामावर रुजू होत आहे, मात्र, यामध्ये किती कामगार शिफ्टनिहाय असावे, सोशल डिस्टन्सिंग, कामगारांच्या जेवण, निवासाची व्यवस्थेची सीईओनी पाहणी करावी, जेणेकरून कोरोनाचा उद्रेक अशा प्रकारातून होणार नाही. विकासकामांना अद्यापही मंजुºया नाही, त्यासाठी सर्वसाधारण सभा लवकर घेणे गरजेचे आहे, अशीही सूचना निधान यांनी केली.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर