शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात भाव काेसळल्याने संत्री झाडावरच; विकण्यापेक्षा फेकणे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 10:44 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क  नागपूर: संत्र्याच्या अंबिया बहाराच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. भाव काेसळल्याने व्यापारी संत्री खरेदी करायला तयार ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

 नागपूर: संत्र्याच्या अंबिया बहाराच्या हंगामाचा शेवटचा टप्पा सुरू आहे. भाव काेसळल्याने व्यापारी संत्री खरेदी करायला तयार नाही. दुसरीकडे, संत्री ताेडून ती बाजारात विकायला नेणे व मिळणाऱ्या भावातून उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने ते शेतकऱ्यांना परवडत नाही. बागा वाचविण्यासाठी संत्री ताेडणे अनिवार्य असल्याने शेतकरी ताेडलेली संत्री उकिरड्यावर फेकत आहेत.

नरखेड तालुक्यात १०,७१२ हेक्टरमध्ये संत्र्याच्या बागा आहेत. तालुक्यातील सावरगाव, नरखेड, बेलाेना, माेवाड, खैरगाव, जलालखेडा, मेंढला, लाेहारीसावंगा, भारसिंगी, भिष्णूर या भागात संत्रा बागांचे प्रमाण अधिक आहे. यावर्षी अति पाऊस व जमिनीत पाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने बागांवर राेगाचा प्रादुर्भाव झाला हाेता. त्यातच परतीचा पाऊस रेंगाळल्याने हंगाम थाेडा लांबला.

बाजारात संत्र्याची आवक वाढल्याने तसेच त्यावर प्रक्रिया करण्याची प्रभावी साेय नसल्याने संत्र्याचे दर दिवसेंदिवस खाली येत आहेत. काही भागात व्यापारी अत्यंत कमी दरात संत्र्याची खरेदी करीत असल्याचे तर काही भागात ते फिरकत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी तालुक्यातील कपाशी, साेयाबीन व माेसंबीसाेबत संत्र्याचे पीकही हातचे गेले आहे. त्यामुळे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र, एकही लाेकप्रतिनिधी यावर बाेलायला आणि प्रशासन प्रभावी उपाययाेजना करायला तयार नाही, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, सर्वेक्षण करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे.

सात हजार रुपये टन भाव

संत्र्याचा उत्पादन खर्च १२ ते १४ हजार रुपये प्रति टन असला तरी संत्र्याला सध्या बाजारात ६ ते ७ हजार रुपये प्रति टन भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संत्री ताेडून बाजारात विकायला नेली तर त्यांना प्रति टन ६ ते ७ हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड साेसावा लागणार आहे. राेग व किडींच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी लागल्याने यावर्षी संत्राचा उत्पादन खर्च वाढला आहे. शेतकरी आता संत्री विकण्यापेक्षा बागा जगवण्याला प्राधान्य देत झाडाची संत्री ताेडून फेकत आहे.

नागपूर जिल्ह्यात संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन नरखेड तालुक्यात केले जाते. शासनाच्या ‘किसान रेल-२०२०’चा शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. येत्या काही दिवसात मृग बहाराचा संत्रा बाजारात येणार आहे. शासनदरबारी सुरू असलेली संत्र्याची उपेक्षा संपायला पाहिजे.

- हिंमत नखाते,

संत्रा उत्पादक, सिंदी (उमरी)

टॅग्स :agricultureशेती