शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

...तर संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक खाक झालं असतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 17:16 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती.

ठळक मुद्देपेट्रोलने भरलेल्या वॅगनला आगमोठी दुर्घटना टळलीअग्नीशमन विभागाने मिळविले आगीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती. सुरुवातीच्या रेल्वेस्थानकावर बेजबाबदारपणा झाल्यामुळे या वॅगनचे झाकण उघडे राहिल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे खरे कारण कळू शकणार आहे.रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीकानेरवरून ५० वॅगनची एक मालगाडी पेट्रोल घेऊन विजयवाडाकडे जात होती. ही गाडी शनिवारी रात्री ३.२० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ मधील लुपलाईनवर आली. मालगाडीच्या इंजिनपासून दहाव्या क्रमांकाच्या वॅगनला (वॅगन क्रमांक-डब्ल्यूआर ४७०८१२१४०७०) ला अचानक आग लागली. वॅगनच्या वरील झाकणातून आगीचे लोळ निघताना दिसत होते. याबाबत उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी त्वरीत अग्निशमन विभागाला पाचारण केले. सिव्हील लाईन्स आणि गंजीपेठ येथील अग्शिशमन विभागाच्या गाड्या त्वरीत रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयांनी फोमच्या (केमिकल) साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर ४.४५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. त्यानंतर ही मालगाडी अजनी यार्डात नेऊन उभी करण्यात आली. तेथे बारकाईने मालगाडीची तपासणी करण्यात आली. दुपारपर्यंत रेल्वेचे अधिकारी मालगाडीबाबत माहिती घेताना दिसले.२००९ मध्ये घडली होती घटनानागपूर रेल्वेस्थानकावर पेट्रोलने भरलेल्या मालगाडीला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ६ मार्च २००९ ला पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला आग लागली होती. त्या वेळी आरपीएफचा जवान प्रमोद दैने, तुषार विघ्ने यांच्यासह जवानांनी कर्तव्यदक्षता दाखविली होती. ओएचई तारेतील विद्युत प्रवाह बंद करून उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ वरील प्रवाशांना दुसरीकडे हलविण्यात आले होते. रेल्वेगाड्यांचे आवागमनही अजनी आणि गोधणी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले होते. त्यावेळीही एक मोठी दुर्घटना टळली होती.निष्काळजीपणा झाल्याची शंकारेल्वे तज्ज्ञांच्या मते पेट्रोलच्या वॅगनमध्ये दोन झाकणे असतात. यात आतील आणि बाहेरील झाकणांचा समावेश आहे. प्राथमिकदृष्ट्या हे मानण्यात येत आहे की बिकानेरमध्ये पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनचे वरील झाकण योग्यरित्या बंद केले नव्हते. त्यामुळे प्रवासात झाकणाचे सील तुटले आणि ते उघडले. यामुळे ओएचई तार आणि वॅगनच्या दरम्यान संपर्क आला आणि शॉट सर्किटमुळे आग लागली असावी. परंतु चौकशीनंतरच आगीचे खरे कारण समजू शकणार आहे.दोन दिवसात येणार चौकशीचा अहवाल‘बिकानेरवरून विजयवाडाला जात असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला रात्री आग लागली होती. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे या घटनेची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. चौकशीचा अहवाल आगामी दोन दिवसात बिकानेर आणि विजयवाडाच्या रेल्वे प्रशासनाला देण्यात येईल त्यानंतर घटनेची चौकशी करण्यात येईल.’-कुश किशोर मिश्र, सिनिअर डीसीएम, मध्य रेल्वे नागपूर विभाग 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरfireआग