शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

पालकांनो आधी संस्कारित व्हा !

By admin | Published: November 17, 2014 12:59 AM

काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील,

संजय रघटाटे : ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ उपक्रमनागपूर : काळाच्या बदलात मुलांमध्येही झपाट्याने बदल होत आहे. आज मुलांना संस्कार शिकविण्याची गरज पडत आहे. कारण पालकच संस्कार विसरले आहेत. घरातून संस्कार हरवले असतील, तर मुले कशी संस्कारित होणार. त्यामुळे आधी पालकांनी संस्कारित व्हावे तेव्हाच मुले सहज संस्कारित होतील, असे मत प्रसिद्ध वक्ते, आॅक्सफर्ड अ‍ॅकेडमीचे संचालक डॉ. संजय रघटाटे यांनी व्यक्त केले. बालकदिनानिमित्त लोकमत सखी मंच व लोकमत कॅम्पस क्लबतर्फे ‘दोन गोष्टी आईसाठी, दोन गोष्टी बाबांसाठी’ या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. सीताबर्डी येथील माहेश्वरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सृजन संस्थेच्या संचालिका आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनुपमा गडकरी व बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा उपस्थित होते. यावेळी डॉ. रघटाटे यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शनाबरोबरच, पालकांना पोटभरून हसविले. ते म्हणाले की, आपण जे करतो, तेच मुले करतात. त्यासाठी पालकांनीच स्वत: चेहऱ्यावर हास्य ठेवावे, दुसऱ्याचा आदर करा, चांगले श्रोते बना, कण्हत कण्हत जगण्यापेक्षा गाणे म्हणत जगा. दृष्टी बदला, सृष्टी नक्कीच बदलेल. आजच्या काळातील मुलांच्या मानसिकतेसंदर्भात बोलताना डॉ. अनुपमा गडकरी म्हणाल्या की, आज पालकांना मुलांच्या बाबतीत चार चॅलेंजेस भेडसावतात. काळानुसार मुलांच्या बुद्धिमत्तेत प्रचंड वाढ झाली आहे.मुलांना रागही लवकर येतो. टेक्नॉलॉजीचा परिणाम मोठा आहे. मुलांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. सामाजिक बदलाच्या स्थित्यंतरामध्ये पालक व बालक एकाच प्लॅटफॉर्मवर आले आहेत. बालकांकडे आज बऱ्यापैकी माहिती आहे. यात काही वाईट आणि चांगलीही माहिती आहे. त्यामुळे पालकांनी भीती न बाळगता त्यांच्या बुद्धिमत्तेचा चांगला उपयोग करून घ्यावा, सामाजिक बदल झाला असला तरी, आईवडिलांप्रती त्यांना आजही जिव्हाळा आहे. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. परिस्थितीनुसार मुलांपुढेही अनेक चॅलेंजेस उभे ठाकले आहेत. त्याला तोंड देण्यासाठी बुद्धिमत्तेची गरज आहे. मुलांना राग लवकर येतो, ते लवकर निराश होतात, त्यामुळे आजचे पालक काळजीत आहेत. जन्मत: प्रत्येक मुलाला १४ भावना असतात. वयानुसार त्याची जाणीव होते. पूर्वी १६ वर्षापर्यंत भावनांची मुलांना जाणीव व्हायची आता ६ व्या वर्षीच भावना जागृत होतात. मुलांमध्ये झालेले बदल पालकांनी ओळखणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजीमुळे मुलांना नव्यानव्या गोष्टी दिसत आहेत. त्याचे परिणाम आणि दुष्परिणामही आहे. टेक्नॉलॉजी नेमकी मुलांना काय शिकवित आहे, याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी पालकांनी बालकांशी संवाद वाढविणे गरजेचे आहे. बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण मिश्रा यांनी मुलांमध्ये वाढत असलेल्या दमा या आजारावर मार्गदर्शन करून उपाय सांगितले कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाचे संचालन लोकमत सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. (प्रतिनिधी)