शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
2
IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध दुसरा सामना आजपासून; खेळपट्टी ठरवणार कसोटी मालिकेचे भवितव्य
3
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
4
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
5
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!
6
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
7
"प्रथमच स्वतःसाठी मागतेय मते"; प्रियांका गांधी यांनी वायनाड मधून भरला उमेदवारी अर्ज
8
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
9
ताशी १२० किमीने धडकणार 'दाना' चक्रीवादळ; पावसाला सुरुवात, ३५० रेल्वे रद्द
10
विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता
11
परस्परांविरोधात प्रचार करणार? संदीप नाईक यांच्या उमेदवारीमुळे गणेश नाईकांपुढे पेच
12
ठाणे मतदारसंघात शिंदेसेनेची भाजपच्या विरोधात बंडखोरी; पाचपाखाडी मतदारसंघावर दावा
13
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
14
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
15
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
16
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
17
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
18
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
19
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा

केंद्रीय समितीच्या ‘ऑन द स्पॉट’ पाहणीत अर्धवट योजना लपवल्या! सदस्यांचा आरोप

By गणेश हुड | Published: July 10, 2024 9:18 PM

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापूर्ण व शुद्ध पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरू केली. सन २०२१, २०२२ पासून जिल्ह्यात योजनांच्या कामाला प्रारंभ झाला.

नागपूर :  जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन अतंर्गत सुरू असलेल्या शेकडो कामांबाबत लोकप्रतिनिधी, सरपंच यांच्या तक्रारी वाढत आहेत. केंद्रीय समितीच्या ‘ऑन द स्पॉट ’पाहणीत तक्रारी असलेल्या गावांचा समावेश न करता अधिकाऱ्यांनी ठराविक गावांतील  पूर्ण झालेल्या  योजनांची कामे दाखवून आपली पाठ थोपटून घेतली. असा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना प्रति व्यक्ती ५५ लिटर गुणवत्तापूर्ण व शुद्ध पाणी देण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन योजना सुरू केली. सन २०२१, २०२२ पासून जिल्ह्यात योजनांच्या कामाला प्रारंभ झाला. १,३०२ योजनांचा यामध्ये समावेश आहे. यापैकी ४३० योजना पूर्ण झाल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. दुसरीकडे जलकुंभासाठी खड्डे खोदले, परंतु कामाला सुरुवात नाही. अशा परिस्थितीत उर्वरित ८७२ योजना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल की नाही. अशी शंका निर्माण झाली आहे.

जल शक्ती मंत्रालयातील एक पथकाने दौऱ्यादरम्यान नागपूर जिल्ह्यातील कामांच्याची पाहणी केली. यात  जलशक्ती मंत्रालयाचे संचालक प्रदीप सिंग, तांत्रिक सल्लागार धीरेंद्र कुमार यांच्यासह इतरांचा समावेश होता.

आढावा बैठकीनंतर  प्रदीप सिंग हे भंडाऱ्यांतील कामांच्या पाहणीसाठी गेले, तर धीरेंद्र कुमार यांनी नागपूर जिल्ह्यातील कामांची पाहणी केली.  मात्र पाहणी दौऱ्यात जिल्हा परिषदेच्या  पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना ज्या तालुक्यातील गावांतील योजनांच्या तक्रारी नाही. अशा ठराविक  गावांच्या भेटीवर नेले. पथकाच्या दौऱ्याबाबत अधिकाऱ्यांनी पदाधिकारी व सदस्यांना सुगावा लागू दिला आहे.  समितीने जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील वलनी, चिचोली, वाकी, सर्रा यासह नागपूर (ग्रा.) तालुक्यातील काही गावांची पाहणी केली. येथील योजनांची कामे पूर्ण झाली असून लोकांच्या तक्रारी नाही. परंतु ज्या ठिकाणी कामे अपूर्णावस्थेत किंवा प्रगतीपथावर आहे.  नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. अशा  गावांपासून समितीला लांब ठेवण्यात आले. समितीनेही स्थानिकांशी चर्चा करून पाण्याच्या गरजेची खातरजमा न करता दौया केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांच्याशी  मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सदस्यांना सुगावा लागू दिला नाही-खापरेज्या गावात शुध्द पाणी उपलब्ध होत आहे, अशच् गावामध्ये केंद्रीय समितीला नेले. परंतु मुळात ज्या ठिकाणी आजही नागरिकांना शुध्द पाणी उपलब्ध होत नाही, योजना रखडल्या  आहेत. अशा गावांपासून समितीला दूर ठेवले. समितीनेही नागरिकांकडून पाण्याच्या गरजेची खातरजमा न करता दौरा आटोपता घेतला. योजना संदर्भात समितीकडे कुणी तक्रारी करू नये, यासाठी जि.प.सदस्य व पदाधिकाऱ्यांना पथकाच्या दौऱ्याचा सुगावा लागू दिला नाही. असा आरोप जि.प.सदस्य  प्रकाश खापरे यांनी केला.

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर