शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
2
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
6
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
7
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
8
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
9
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
11
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
12
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
13
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
14
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
15
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
16
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
17
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
18
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
19
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
20
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा

‘पीडीएम पाेटॅश’; शेतकऱ्यांची होतेय तिहेरी फसवणूक

By सुनील चरपे | Published: May 16, 2023 6:39 PM

Nagpur News काही कंपन्या ‘पीडीएम’ (पाेटॅश डिराइव्हड माेलॅसिस) एमओपीच्या दराने विकत आहे. एमओपीच्या तुलनेत पीडीएममध्ये अल्प प्रमाणात पाेटॅश असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुटीसाेबतच तिहेरी फसवणूक हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सुनील चरपे

नागपूर : चार महिन्यांपासून ‘एमओपी’ (म्युरेट ऑफ पाेटॅश)ची आयात बंद असल्याने देशात तुटवडा निर्माण झाला आहे. याला पर्याय म्हणून काही कंपन्या ‘पीडीएम’ (पाेटॅश डिराइव्हड माेलॅसिस) एमओपीच्या दराने विकत आहे. एमओपीच्या तुलनेत पीडीएममध्ये अल्प प्रमाणात पाेटॅश असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक लुटीसाेबतच तिहेरी फसवणूक हाेत असल्याचे निदर्शनास आले आहे.

प्रत्येक पिकाला नायट्राेजन, फाॅस्फरस आणि पाेटॅशिअम या तीन मूलभूत घटकांची नितांत आवश्यकता असते. पाेटॅशिअमच्या पूर्ततेसाठी पिकांना प्रति एकर ५० किलाे म्हणजेच ३० टक्के पाेटॅश देणे अनिवार्य असते. यासाठी शेतकरी पाेटॅशचे ६० टक्के प्रमाण असलेल्या एमओपीचा वापर करतात. चार महिन्यांपासून देशात एमओपीचा तुटवडा निर्माण झाला आहे. हीच संधी साधून काही कंपन्या १४.५ टक्के पाेटॅश असलेल्या पीडीएमची चढ्या दराने विक्री करीत आहेत. विशेष म्हणजे, एमओपी आणि पीडीएम यात किती टक्के पाेटॅश असते, याबाबत बहुतांश शेतकरी अनभिज्ञ आहेत.

चार महिन्यांपूर्वी बाजारात एमओपीचे दर एक हजार रुपये प्रति बॅग (५० किलाे) हाेते. सध्या पीडीएमची विक्री ९०० रुपये प्रति बॅग (५० किलाे) दराने केली जात आहे. विशेष म्हणजे, पीडीएमची निर्मिती उसाच्या मळीपासून केली जात असून, त्याचा प्रति बॅग उत्पादन खर्च २०० ते २५० रुपये आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे पीडीएमचे दर प्रति बॅग ३०० ते ३५० रुपयांत मिळायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयात का थांबली?

एमओपीची आयात रशिया आणि युक्रेनमधून केली जाते. केंद्र सरकारने एमओपीच्या आयातीकडे दाेन वर्षांपासून दुर्लक्ष केले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे चार महिन्यांपासून एमओपीची आयात थांबली असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी सांगतात. वास्तवात, या दाेन्ही देशांमधून सूर्यफूल, गहू व इतर वस्तूंची आयात सातत्याने सुरू असताना, एमओपीचीच आयात का थांबली आहे, यावर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पीडीएममुळे एमओपीकडे दुर्लक्ष

बाजारात एमओपीला पर्याय म्हणून पीडीएम उपलब्ध आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एमओपीच्या पुरवठ्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा पर्याय उपलब्ध नसता तर शेतकऱ्यांनी एमओपीच्या पुरवठ्याची मागणी केली असती. पीडीएममुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट व फसवणूक हाेत असल्याचे कृषी विभागासह सर्वांनाच माहिती आहे. मात्र, कुणीही बाेलायला तयार नाही.

पिकांवर हाेणारे परिणाम

पाेटॅशचे प्रमाण कमी असल्याने पीडीएमचा पिकांना फारसा फायदा हाेत नाही. पाेटॅशच्या अभावामुळे शेतमालाचे उत्पादन घटते व दर्जा खालावताे. दर्जा खालावलेल्या शेतमालाला बाजारात कमी दर मिळताे. एमओपी मिळत नसल्याने आपले माेठे आर्थिक नुकसान हाेत असल्याचे खान्देशातील केळी उत्पादकांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेती