शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास

By आनंद डेकाटे | Published: May 21, 2024 5:13 PM

अंनिसचे संघटक पंकज वंजारे : युवा व्यक्तिमत्व - वक्तृत्व, कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संतांनी आपल्या साहित्यातून आनंदी जीवन जगण्याचे मार्ग आणि तत्वज्ञान दिले आहे. ज्याची आजच्या पिढीला नितांत गरज असून संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक तथा प्रसिद्ध वक्ते पंकज वंजारे यांनी केले. 

विद्यापीठाच्या पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग येथे 'राष्ट्रसंतांच्या मूल्यांतील व्यक्तिमत्व - संवाद कौशल्य विकास' या विषयावर तीन दिवसीय युवा प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विदर्भ युथ ऑर्गनाईजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून वंजारे मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग प्रमुख डाॅ. प्रमोद वाटकर, डॉ. धनंजय सोनटक्के उपस्थित होते.  

वंजारे यांनी 'संतांचा जीवन दृष्टीकोन, वेळ, करिअरचे व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन करताना  संत कबीर , संत रोहीदास, ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास , राष्ट्रसंत तुकडोजी, गाडगे महाराज यांच्या साहित्यातील दाखले देत संत कोणाला म्हणावे हे पटवून दिले. संत ज्ञानेश्वर माऊली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पर्यंत संतांनी समाजात मानवी मूल्ये रुजवली आहे. संतांनी कोण्या एका जाती, धर्माची कास धरली नाही. कर्म हाच मनुष्याचा धर्म असल्याचे संत रविदास यांनी सांगितले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तर २५०० बुद्ध जयंती साजरी करताना नागरिकांना समयदान मागितले होते. संत प्रचंड क्रांतिकारक होते. संतांनी जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ज्ञान वाटण्याचे आवाहन केले होते. संतांनी समाज सुधारणा केली. समाजाला दिशा देण्याचे काम संतांनी केल्याचे वंजारे म्हणाले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर