शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

स्थानिक स्वराज्य संस्थातील ओबीसी आरक्षणाला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 13:45 IST

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्गाला सरसकट २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला वाशीम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विकास गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात याचिका राज्य सरकार, निवडणूक आयोगाला नोटीस

नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्गाला सरसकट २७ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला वाशीम जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते विकास गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार, राज्य मागासवर्ग आयाेग व राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून यावर ४ डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील याचिका निकाली काढताना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जायला नको, असा निर्णय दिला, तसेच नागरिकांचा मागासवर्गाचे आरक्षण ठरविण्यासाठी विशेष आयोगाची स्थापना व या आयोगाच्या शिफारशीनुसार कृती करण्याचे निर्देश दिले. याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांचा मागासवर्गाला सरसकट २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय अवैध ठरवून, या प्रवर्गातील सर्व निर्वाचित उमेदवारांची पदे रिक्त झाल्याचे जाहीर केले.

या निर्णयानुसार, नागरिकांचा मागासवर्गाच्या आरक्षणाची टक्केवारी निश्चित करण्यासाठी आवश्यक अभ्यास व माहिती गोळा करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगावर सोपविण्यात आली होती. या आयोगाचा अहवाल अद्याप सादर झाला नाही. असे असताना राज्याच्या विधी व न्याय विभागाचे मुख्य सचिवांनी महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहत कायदा-१९६५, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा-१९६१, महाराष्ट्र ग्राम पंचायत कायदा-१९५९, मुंबई महानगरपालिका कायदा-१९८८ आणि महाराष्ट्र महानगरपालिका कायदा-१९४९ यामध्ये सुधारणा करून नागरिकांचा मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्यासाठी २३ सप्टेंबर २०२१ व १ ऑक्टोबर २०२१ रोजी वटहुकूम जारी केले.

त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाविषयी ८ व ९ नोव्हेंबर २०२१ रोजी परिपत्रके काढली. हे वटहुकूम व परिपत्रके अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अक्षय नाईक, निवडणूक आयोगातर्फे ॲड. जेमिनी कासट तर, राज्य सरकारतर्फे ॲड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.

सध्या स्थगिती देण्यास नकार

याचिकाकर्त्याने वादग्रस्त वटहुकूमांवर अंतरिम स्थगिती देण्याची विनंती न्यायालयाला केली. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होतपर्यंत ही विनंती मान्य करण्यास नकार दिला, तसेच या विनंतीवर पुढच्या तारखेला विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Courtन्यायालयOBCअन्य मागासवर्गीय जातीreservationआरक्षण