शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

पाण्यावरील पीएच.डी. व्यवस्थेत आटली!

By admin | Published: March 22, 2016 2:45 AM

दुष्काळावर राज्यातील राजकारण तापले आहे. टंचाईच्या झळा विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी सोसतो आहे. गावात-वस्तीत

जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरदुष्काळावर राज्यातील राजकारण तापले आहे. टंचाईच्या झळा विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी सोसतो आहे. गावात-वस्तीत टँकर वॉर सुरू झाले आहे. दशकभरात टँकर लॉबी श्रीमंत झाली, मात्र पाण्यासाठी सातासमुद्राबाहेर जाऊन पीएच.डी. करणाऱ्या एका जलदूताचे स्वप्न अद्यापही कोरडे आहे. त्याने पाणी वाचविण्यासाठी समाजाला दिलेला संकल्पही आटला आहे.वर्धा जिल्हा परिषदेत पाणीपुरवठा विभागात अभियंता असताना नरेश सायंकार यांनी पाण्यासाठी गावातील महिलांची पायपीट पाहिली. तंटेही अनुभवले. त्यामुळे अवघा महाराष्ट्र टंचाईमुक्त असावा, असा संकल्प करीत नोकरी सोडली. यानंतर सायंकार यांनी ‘रिचार्जिंग आॅफ ग्राऊंड वॉटर इन इंडिया दि नीड आॅफ दि अवर’ या विषयावर वॉशिंग्टन, अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठात संशोधन केले. सायंकार यांचे संशोधन मान्य करीत विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. प्रदान केली. जलसंधारण क्षेत्रात भारतात पहिली पीएच.डी. मिळविण्याचा मान असला तरी, या जलदूताने सांगितलेल्या एकाही गोष्टीचा अंमल समाजाने स्वीकारला नाही; कारण ग्लोबल वॉर्मिंगसोबत आमची व्यवस्थाही आटत चालली आहे! मात्र अजूनही हा जलदूत गावोगावी फिरतो आहे. जलसंवर्धनासाठी आतापर्यंत चार हजाराहून अधिक गावांची पायपीट करणाऱ्या सायंकार यांचा पॅटर्न ना समाजाने १०० टक्के स्वीकारला ना सरकारने. सायंकार यांनी पावसाच्या पाण्याचे व इतर जलस्रोतांच्या माध्यमातून पुनर्भरण कसे करावे, यासाठी त्यांनी कमी खर्चाचे १० उपाय शोधले आहेत. गावकऱ्यांना लवकर समजावे म्हणून त्याची रेखाटने त्यांनी केली आहेत. त्याचे प्रात्यक्षिकही ते करून दाखवितात. ज्यांनी त्यांचा पॅटर्न स्वीकारला, त्यांना फायदाही झाला. मात्र सरकारी घोडे चालविणाऱ्या अधिकाऱ्यांनी ग्रामपातळीवर याची सक्ती केली नाही. जिथे सक्ती झाली तिथे निधीचे कारण आडवे आले. सायंकार पॅटर्न व्यवस्थेत मुरला. इतकेच काय तर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात ‘जलसंधारण व्यवस्थापन’ अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव सायंकार यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकार आणि राज्यपालांनी या प्रस्तावाला अनुमती दर्शवीत विद्यापीठांनी ‘जलसंधारण व्यवस्थापन’ अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.उन्हाळा लागला की गावाबाहेरील विहिरीवरून गावात टँकरने पाणी आणण्याची प्रथा अवघ्या महाराष्ट्रात आहे. पण गावातील विहिरीत वा बोअरचे पाणी का आटले, असा कुणीही प्रश्न करीत नाही. यासाठी पाणी बचत करावी लागेल, असे सारेच सांगतात. पण मी १० कलमी कार्यक्रम सांगतो. तोही कमी खर्चाचा. माझा प्रयोग फेल ठरला तर पुन्हा पाण्यावर बोलणार नाही. पण एकदा तरी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने हा प्रयोग स्वीकारावा.- डॉ. नरेश सायंकारजलतज्ज्ञ