शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गरीब विद्यार्थ्यांसाठी कायद्याच्या शिक्षणाचा ‘प्लॅटफॉर्म’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:34 IST

विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशात गेली होती. लहानपणी पाहिलेला ‘स्वदेस’ आणि देशाच्या ओढीने परत येणारा ‘मोहन भार्गव’ तिच्या मनात घर करुन राहिला होता. विधीसारख्या अभ्यासक्रमात विदेशातील विद्यापीठात ‘मेरिट’ आल्यानंतर गगन ठेंगणे होणे सहज शक्य होते. मात्र स्वत:चे पाय मातीशीच जुळवून ठेवले आणि चक्क एक अनोखा संकल्पच केला. विधीचे शिक्षण घेतल्यानंतर गरीब घरातील विद्यार्थ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून विदर्भातील ‘टॅलेंट’ घडविण्याचा तिने विडाच उचलला आहे. ही कहाणी आहे, पायल बावनकुळे-आष्टनकर या तरुणीची.

ठळक मुद्देथेट रोजगाराची संधी : विदर्भातील विधीक्षेत्रात अनोखा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशात गेली होती. लहानपणी पाहिलेला ‘स्वदेस’ आणि देशाच्या ओढीने परत येणारा ‘मोहन भार्गव’ तिच्या मनात घर करुन राहिला होता. विधीसारख्या अभ्यासक्रमात विदेशातील विद्यापीठात ‘मेरिट’ आल्यानंतर गगन ठेंगणे होणे सहज शक्य होते. मात्र स्वत:चे पाय मातीशीच जुळवून ठेवले आणि चक्क एक अनोखा संकल्पच केला. विधीचे शिक्षण घेतल्यानंतर गरीब घरातील विद्यार्थ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून विदर्भातील ‘टॅलेंट’ घडविण्याचा तिने विडाच उचलला आहे. ही कहाणी आहे, पायल बावनकुळे-आष्टनकर या तरुणीची.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘एलएलबी’ची पदवी प्राप्त केल्यानंतर पायलने लंडन येथे ‘युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्स’मध्ये प्रवेश घेतला. ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस लॉ’ अभ्यासक्रमात जगभरातील विविध देशांतील विद्यार्थी होते. मात्र भारतीय गुणवत्ता सिद्ध करत पायलने तेथे अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तेथेच गलेलठ्ठ ‘पॅकेज’वर ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात काम करण्याची तिला संधी होती. मात्र स्वत:ला सिद्ध करण्यासोबतच तिला तरुण विद्यार्थ्यांना एक ‘रोडमॅप’ तयार करुन द्यायचा होता. त्यामुळेच भारतात परतण्याचा शेवटी निर्णय घेतला. वडील चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील मंत्री असल्याने देशातदेखील मोठ्या कंपनीत ती सहजपणे काम करु शकली असती. मात्र वडिलांच्या नावाचा उपयोग न करता पायलने स्वत:मधील कर्तृत्वाने नागपुरातच ‘केपीबी बिझनेस अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड’ या विधी ‘फर्म’ची स्थापना केली. पाच वर्षे अभ्यास करुन पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच आर्थिक मिळकत सुरू होईल याची शाश्वती नसते. अनेकदा तर मोठ्या वकीलाच्या मार्गदर्शनात कुठलेही मानधन न घेता काही वर्षे काम करावे लागते. त्यानंतर ‘प्रॅक्टिस’ सुरू होऊन जम बसायला वेळ लागतो. वयाची तिशी ओलांडल्यावरही अनेक जण आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होत नाहीत. यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची सर्वात जास्त फरफट होते. त्यामुळेच या ‘फर्म’च्या माध्यमातून अशा गुणवंत विद्यार्थ्यांना थेट रोजगार देण्याचा माझा मानस असल्याचे पायलने सांगितले.विदर्भात विधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वलमहाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाले असून नागपुरात ‘सिम्बॉयसिस’ येत असल्याने विधी शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही वर्षात नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. ‘मेट्रो’ आल्यामुळे जागतिक कंपन्यांची नजर नागपूरकडे आहे. ‘आयटी’ कंपन्या अगोदरपासूनच येथे आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात नागपुरात ‘कॉर्पोरेट’ संस्कृती वाढीस लागेल. अशा स्थितीत विधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने विचार करावा. नागपूर व विदर्भातील विधी पदवीधारकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत पायलने मांडले.तरुणींनी पुढाकार घ्यावावकील झाल्यानंतर साधारणत: स्वत:ची ‘प्रॅक्टीस’ करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र विधी पदवीधारकांची ‘कॉर्पोरेट’सह विविध क्षेत्रात प्रचंड आवश्यकता आहे. मोठ्या शहरात एकच ‘फर्म’ विविध क्षेत्रातील समस्या हाताळताना दिसते. नागपुरात तशी फारशी सुरुवात झालेली नाही किंवा तसे अनुकूल वातावरण नाही. माझ्या ‘फर्म’च्या माध्यमातून मी तो पुढाकार घेतला आहे. तरुणींनी विधी क्षेत्रात झपाट्याने पुढे येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन यावेळी पायलने केले.

 

 

टॅग्स :advocateवकिलEducationशिक्षण