शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

सुखद धक्का : चोरल्या गेलेल्या ४५ लाखांच्या चिजवस्तू प्रवाशांना परत

By नरेश डोंगरे | Published: January 07, 2024 6:27 PM

१७८ प्रकरणांचा उलगडा : रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सेवा ही संकल्प’ अशी गाठ बांधून कर्तव्यावर राहणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या वर्षभरात चोरी गेलेल्या, गहाळ झालेल्या माैल्यवान चिजवस्तू परत करून रेल्वे प्रवाशांना सुखद धक्का दिला.

रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाडीत चोरी झाली किंवा घाईगडबडीत कोणती माैल्यवान चिजवस्तू, रक्कम गहाळ झाली तर ती परत मिळणार नाही, असेच अनेकांना वाटते. त्यामुळे कित्येक प्रवासी छोट्या, मोठ्या रक्कम अथवा चिजवस्तूची तक्रार नोंदविण्याची तसदी घेत नाहीत. काही जण रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना साधी माहितीही देत नाही. मात्र, ते चुकीचे आहे. रक्कम, वस्तूची किंमत कितीही असो, ती चोरी गेली किंवा गहाळ झाली तर त्याची माहिती रेल्वे पोलिस किंवा आरपीएफला दिल्यास ती परत मिळण्याची आशा असते. गेल्या वर्षभरात अर्थात २०२३ मध्ये १७८ प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाने अशा प्रकारे ४४ लाख, ९४ हजार, २०५ रुपये किमतीचे साहित्य ज्याचे त्याला परत केले. त्यात कुणाची पर्स, कुणाची बॅग, कुणाचा मोबाइल तर कुणाचा लॅपटॉप आदीचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, ज्यांनी तक्रार नोंदवली होती, त्यातील कित्येकांनी नंतर आपल्या सामानाचे काय झाले, त्याची साधी चाैकशीही कधी केली नव्हती. मात्र, आरपीएफने स्वत:च त्या व्यक्तींचा पत्ता शोधून त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या चिजवस्तू त्यांना परत केल्याची माहिती आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी दिली आहे.

तक्रार, माहिती देण्याचे आवाहन

ज्या कुणा प्रवाशाची चिजवस्तू चोरीला गेली किंवा गहाळ झाली अशांनी रेल्वे पोलिस किंवा आरपीएफकडे माहिती द्यावी. घटनेनंतर लगेच प्रत्यक्ष भेटून तक्रार अथवा माहिती देणे शक्य नसेल तर १३९ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी. त्यामुळे भविष्यात त्यांना त्यांची चिजवस्तू परत मिळू शकते, अशी माहितीही आर्य यांनी दिली आहे.