शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

पुलवामा घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे; पटोलेंसह संजय राऊत यांची चौकशीची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: April 15, 2023 14:39 IST

देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झालाय - पटोले

नागपूर : जम्मू काश्मिरचे चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत स्पष्ट केलेली भूमिका भयावह आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घातक आहे. राष्ट्रद्रोह आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशाला उत्तर द्यावे, या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.

पटोले म्हणाले, ज्या पद्धतीने पुलवामा घटनेमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी देशासाठी संरक्षणासाठी निरपराध सैनिकांचा मृत्यू होणे आणि त्याचे राजकरण करून देशाची निवडणूक जिंकणे याचा प्रयत्न झाला आहे. या विश्वासघातकी व्यवस्थेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे. देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झाला आहे. भाजपचे संघटन महासचिव राम माधव यांनी जम्मू काश्मिरच्या सुरक्षेसाठी जे काही पैसे दिले जातात, त्या फाईलवर सही सही करण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही मलिक यांनी केली आहे. यावरून सुरक्षेतही भाजप किती मोठा भ्रष्टाचार करीत आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांना उत्तर द्यावे लागेल, अशी मागणी पटोले यांनी केली.

सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा - राऊत 

हा मोठा गौप्यस्फोट नाही, ही गोष्ट देशाला आधीच माहीत होते. त्यावेळचे सत्ताधारी यांना निवडणुका जिंकण्यासाठी काहितरी गडबड करतील हे माहीत होतं. हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला. १५० किलो आरडीएक्स त्याठिकाणी गेले, आरडीएक्स पोहचले कसे, पुलवामा रस्त्यावर जवान का पाठवले, त्यांच्यासाठी विमान का पाठवले नाही, की जवानांची हत्या व्हावी आणि निवडणुका जिंकायच्या असा आरोप केल्यावर आमच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला. मात्र आज सत्यपाल मलिक यांनी थेट सत्य मांडले. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालविला पाहिजे, आणि जे दोषी आहे त्यांचे कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे. राजकीय लाभ घेण्यासाठी या हत्येचा फायदा केला गेला, याची चौकशी व्हावी खा. संजय राऊत यांनी नागपुरात केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला