शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
4
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
5
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
6
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
7
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
8
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
9
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
10
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
11
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
12
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
13
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
14
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
15
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
16
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
17
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
18
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
19
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
20
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल

समाजभान जपणारी कविता

By admin | Published: December 27, 2015 3:31 AM

वाङ्मय ही संवाद कला आहे. त्यामुळेच दोन रसिकांचा संवाद हे देखील साहित्य ठरते.

सुधाकर गायधनी : प्रीतगंधा कवितासंग्रहाचे प्रकाशननागपूर : वाङ्मय ही संवाद कला आहे. त्यामुळेच दोन रसिकांचा संवाद हे देखील साहित्य ठरते. कवयित्री माला पारधी म्हणजे कवितेचे बीजसत्व असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या या कवितासंग्रहात प्रीतीचा गंध दरवळतो पण तरीही त्यांच्या कवितेने समाजभान सोडलेले नाही. त्यांच्या कविता भावकवितेशी नातेबद्ध आहे. त्यांच्या काही कविता गझल या आकृतीबंधांची आठवण करून देणाऱ्या आहेत, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. कवयित्री माला पारधी यांच्या ‘प्रीतगंधा’ कवितासंग्रहाचे प्रकाशन हॉटेल रंगोली येथे सुधाकर गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, ज्येष्ठ साहित्यिक श्यामकांत कुळकर्णी, कवयित्री डॉ. रेखा लांजेवार उपस्थित होत्या. गायधनी म्हणाले, हल्ली सर्वत्र कविता गवतासारखी पसरलेली असताना ‘प्रीतगंधा’ हे बहरलेले फुलझाड आहे. डॉ. वि. स. जोग यांनी सर्व वक्त्यांच्या वक्तव्याचा परामर्श घेत कवितासंग्रहातील सौंदर्यस्थळे आणि बलस्थाने मार्मिकपणे उलगडून दाखविली. श्यामकांत कुळकर्णी यांनी कवितासंग्रहातील कवितांचे रसग्रहण केले. शैलेंद्र लेंडे म्हणाले, कवी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे हे कठीण काम आहे. त्यासाठी कवीचा अभ्यास आणि चिंतन असणे आवश्यक आहे. त्याशिवाय सिद्ध करता येत नाही. माला पारधी यांच्या कवितेतून सर्वच भाव प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, असे मत व्यक्त केले. रेखा लांजेवार यांनी प्रेमकवितांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैशली टालाटुले यांनी तर आभार प्राप्ती पारधी यांनी मानले. याप्रसंगी माला पारधी यांनी प्रास्ताविकातून कवितासंग्रहाची निर्मितीप्रक्रिया सांगितली. (प्रतिनिधी)