शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

प्रदूषणाची विषारी मगरमिठी : जीव कासावीस, जंगल काळवंडले, जमीन करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2022 11:47 AM

भरपूर पाणी, सुपीक जमीन आणइ नजर पोहोचेल तिथपर्यंत जंगल, वनसंपदा व वन्यप्राण्यांनी संपन्न व समृद्ध अशा विदर्भाला महाभयंकर विषारी प्रदूषणाचा डाग लागला आहे. विकासाच्या नावाने आलेले जवळपास सगळे प्रकल्प पर्यावरणाची हानी करणारे, निसर्गसंपदेचा ऱ्हास घडविणारेच निघाले. परिणामी जमिनी करपल्या, जलप्रदूषण वाढले, हवा दूषित झाली, जंगले काळी पडू लागली. विदर्भाचा हा समृद्ध ठेवा काळवंडला.

ठळक मुद्देभूगावच्या उत्तम गलवा स्टील कंपनीतून वातावरणात विषाची फवारणी

नरेश डोंगरे / कमल शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लाेहखनिज पिघळवून लोखंड तयार करणाऱ्या, त्यासाठी वातावरणात सतत आग ओकणाऱ्या वर्धेनजीकच्या भूगाव येथील लॉयडस् अर्थात उत्तम गलवा स्टील प्लांटमुळे भूगावसह आजूबाजूच्या गावातील जीव, जंगल, जल अन् जमीन अक्षरश: करपली आहे. या प्रदूषणाबद्दल सातत्याने होत असलेल्या तक्रारींची दखल घेत लोकमत चमूने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत अत्यंत धक्कादायक वास्तव उजेडात आले असून, शेतकरी तसेच पशु-पक्ष्यांच्या जिवावर उठलेल्या आणि सोबतच बेरोजगारांची कोंडी करणाऱ्या या कारखान्याची दादागिरी खपवून कशी घेतली जाते, असा कळीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

परिसरावर काळा थर

लोखंड तयार करणाऱ्या या कारखान्याच्या चिमण्या वरून विषारी धूर ओकतात तर कारखान्यातून निघालेले लोहमिश्रीत विषारी रसायन मागच्या भागातून खोदलेल्या नाल्यातून सोडले जाते. या लोटामुळे आजूबाजूची जमीन बंजर, नापीक बनली. जमिनीची उत्पादनक्षमता कमालीची घटली असून, इतर भागात एकरी ५ ते ७ क्विंटल कापूस होत असेल तर कारखान्याच्या नाल्यालगतच्या शेतात एकरी २ ते ३ क्विंटलच कापूस निघू लागला. या कापसाची प्रत (दर्जा) ही निकृष्टच. त्यामुळे बाजारात पाच ते सात हजार रुपये क्विंटल कापसाला भाव मिळत असताना या भागातील कापूस कुणी तीन हजारांत घ्यायला तयार नसल्याचे गाऱ्हाणे शेतकरी मांडतात. सोयाबीन, ज्वारी, गहू अन् हरभऱ्यासह तुरीचीही हीच व्यथा. कारण ही सर्वच उत्पादने काळेपण घेऊन बाहेर येतात. धुराच्या लोळांमुळे पिकांवर, पाना-फुलांवर काळ्या क्षाराचा थर चढलेला दिसतो. हा काळेपणा काढण्यासाठी पीक धुवून काढले जाऊ शकत नाही. त्यामुळे मिळालेल्या भावात शेतकरी आपला माल विकून मिळेल ते पदरात पाडून घेतात.

साठे-घंगारेंनी पाहिलेले स्वप्न आणि आजची वाताहत

वर्धेतून सतत लोकसभेवर निवडून जाणारे दिवंगत काँग्रेस नेते वसंतराव साठे व त्यांचे प्रतिस्पर्धी रामचंद्र घंगारे यांच्या राजकीय जुगलबंदीतून लॉयडस् स्टील कारखाना उभा राहिला. वर्धेच्या विकासासाठी काय करता, बेरोजगारांच्या हाताला काम देणारा कोणता मोठा प्रकल्प आणला, असा प्रश्न कॉ. घंगारे हे साठेंना विचारायचे. ‘मी कारखाना आणीन अन् तुम्ही लेबर युनियन उभी करून तो बंद पाडाल’, असे साठे यांचे घंगारेंना प्रत्युत्तर असायचे. तेव्हा १९९२-९३च्या दरम्यान घंगारे यांनी साठे यांना जाहीर सभांमधून ‘तुम्ही कारखाना आणा, मी कामगार संघटना उभी करणार नाही’, असे वचन दिले. त्यातूनच त्यावेळी पोलाद मंत्री असलेल्या साठे यांनी वर्धेत लॉयडस् स्टील प्लांट आणला. हा कारखाना वर्धा जिल्ह्याच्या विकासाला चालना देईल, भरपूर रोजगार निर्माण होईल, सामान्यांच्या हातात पैसा खुळखुळेल, जीवनमान सुखकर होऊन बाजारपेठा फुलतील, असे स्वप्न होते. १९९५-९६च्या दरम्यान लॉयडसचे उत्पादन सुरू झाले. पाच-सात वर्षे ठिकठाक सुरू होते. नंतर कारखान्याला घरघर लागली. कारखाना डबघाईस येणे सुरू झाले. कामगारांचे प्रश्न, सुविधा, सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले. कारखान्याच्या आत आणि बाहेर संघर्ष वाढला. त्यामुळे दिवाळखोरीत ढकलला गेलेला कारखाना अखेर लॉयडस् प्रशासनाने उत्तम गलवा कंपनीकडे सोपवला.

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषणnagpurनागपूर