शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

जलसंपदाची पदभरती स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 3:14 AM

राज्य जलसंपदा विभागाच्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता पदभरतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

‘बीई’च्या विद्यार्थ्यांना डावलले : इच्छुक उमेदवारांची न्यायालयात धावयोगेश पांडे नागपूर राज्य जलसंपदा विभागाच्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता पदभरतीची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या पदांसाठी विभागाकडून केवळ अभियांत्रिकी पदविका उमेदवारांचेच अर्ज मागविण्यात आले होते. यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करीत अभियांत्रिकी पदवीप्राप्त इच्छुक उमेदवारांनी राज्यातील विविध न्यायालयांमध्ये याविरोधात याचिका दाखल केल्या. संबंधित याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आला नसल्यामुळे विभागाने हा निर्णय घेतला आहे. ‘लोकमत’नेच सर्वात अगोदर हे प्रकरण उचलून धरले होते.जलसंपदा व जलसंधारण विभागातील गट ‘ब’अंतर्गत येणाऱ्या १ हजार २५६ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांच्या भरतीसाठी विभागाकडून जानेवारी महिन्यात जाहिरात देण्यात आली. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समितीच्या वतीने महाआॅनलाईनच्या माध्यमातून २५ मार्च रोजी राज्यातील सहा विभागांतील जिल्हास्थानी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती.पदनिवडीसाठी स्थापत्य अभियांत्रिकीमधील तीन वर्षे कालावधीची पदविका आवश्यक असल्याची अट ठेवण्यात आली व यामुळे चार वर्षे ‘बीई’ (बॅचलर आॅफ इंजिनिअरिंग) केलेले उमेदवारांचे ‘आॅनलाईन’ अर्ज नाकारण्यात आले. ‘बीई’ही पदवी पदविकेपेक्षा जास्त दर्जाची असूनदेखील अशाप्रकारे डावलल्याविरोधात संतप्त इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणातदेखील फिर्याद मांडली. यादरम्यान, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर अद्याप अंतिम सुनावणी झालेली नाही. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानादेखील जर भरती प्रक्रिया राबविली तर अडचण निर्माण होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन संबंधित प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. उमेदवारांमध्ये संभ्रमदरम्यान, ही पदभरती स्थगित झाली असल्याबाबतदेखील उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बहुतांश उमेदवारांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात याचिका मांडली व पदवी उमेदवारांनादेखील अर्ज भरू देण्याची परवानगी मागितली. या प्रक्रियेवर स्थगितीची कुठलीही मागणी केलेली नाही. मग कशाच्या आधारावर पदभरतीला स्थगिती देण्यात आली आहे, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)