शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

गणेशनगरीतील पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:09 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क काेराडी : बाेखारा ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गणेशनगरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. परिणामी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेराडी : बाेखारा ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या गणेशनगरी वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या याेजनेचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. परिणामी याठिकाणी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने वसाहतीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपुरवठा याेजनेचे वीजबिल भरण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असल्याने ग्रामपंचायतीने बिलाचा भरणा करण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली. मात्र ग्रामपंचायतीने आठ लाखांचे थकीत बिल भरण्यास हतबलता दाखविल्याने नागरिकांनी आता ऊर्जा तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना साकडे घातले आहे.

गणेशनगरी या वसाहतीला बिल्डरच्या वतीने स्वतंत्र पाणीपुरवठा याेजना कार्यान्वित करण्यात आली. ग्रामपंचायतशी २००६ मध्ये झालेल्या करारानुसार या याेजनेचे वीजबिल भरण्याबाबत ग्रामपंचायतीने मान्य केले. तेव्हापासून ग्रामपंचायत पाणीपुरवठा याेजनेचे बिल भरत आहे. सध्या विद्युत बिलापाेटी आठ लाखांची थकबाकी असल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे वसाहतीत पाणी समस्या निर्माण झाली. नागरिकांनी सरपंच अनिता पंडित व ग्रामविकास अधिकारी निमजे यांच्याकडे बिलाचा भरणा करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली असता, निधी उपलब्ध नसल्याचे सांगून ग्रामपंचायतीने हतबलता दाखविली.

त्यामुळे या वसाहतीला पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. सरपंच अनिता बाबा पंडित व ग्रामविकास अधिकारी निमजे यांच्याकडे नागरिकांनी विजेचे बिल भरून पाणीपुरवठा सुरू करण्याची विनंती केली असता ग्रामपंचायतीकडे विजेचे बिल भरण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीने हतबलता दाखवली. दरम्यान, नागरिकांनी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा याेजनेचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. निवेदन देताना रामदास बडवाईक, किशोर मेश्राम, एस. आर. दुधे, के. पी. राऊत शिशुपाल कनोजे, समीर ढोरे, राहुल भटकर, सतीशचंद्र जोशी, दिनेशकुमार सिंग, शंकर कुशवाह, पी. पी. मुंगसे, एस. बी. देशमुख, दिलीप धकाते आदी उपस्थित हाेते.

यासंदर्भात सरपंच अनिता पंडित यांच्याशी संपर्क साधला असता, काेराेनामुळे ग्रामपंचायत आर्थिक अडचणीत आहे. वीजबिल भरण्यासाठी निधी उपलब्ध नाही. अशा स्थितीत महावितरणने पूर्वसूचना न देता पाणीपुरवठा याेजनेचे वीज कनेक्शन कापले आहे. ऊर्जामंत्र्यांनी संबंधितांना आदेश देऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा. गणेशनगरीसह बाेखारावासीयांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने साकारलेली याेजना लवकर कार्यान्वित व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. यासाठी प्राथमिकता असल्याचे मत सरपंच अनिता पंडित यांनी व्यक्त केले.