शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

"किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी; १९७७ ची पुनरावृत्ती होऊ नये"

By आनंद डेकाटे | Published: February 07, 2024 4:48 PM

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे विधान

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  निवडणूकीत जागा व मोदींचा पराभव हा नंतरचा भाग आहे. राजकारण होत राहील. परंतु, सत्तेत आल्यास काय करायचे याचा अजेंडा ठरला पाहिजे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या बैठकीच्या प्रारंभापासून आपण किमान समान कार्यक्रमावर भर दिला. त्यासाठी आग्रह धरला. यासाठी वंचीतने शेतकऱ्यांच्या प्रश्नासह एकूण ३१ विषयांचा मसुदा तयार केला. आघाडीतील इतरांनीही तो तयार करावा. पुढील बैठकीत या मसुद्यावर चर्चा होईल. त्यानंतरच्या बैठकीत जागा वाटपावार चर्चा होईल, असे स्पष्ट करीत किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी होईल, असे सूचक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार एड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

बुधवारी ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीसोबत चर्चा वाटपावर सध्या कुठलीही चर्चा झालेली नाही. किंवा आमच्याकडून सुद्धा कुठल्याही जागेची मागणी करण्यात आलेली नाही. चर्चा होत नव्हती म्हणून १२ जागांचा मुद्दा छेडण्यात आला होता, असेही एड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

एड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आघाडीसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम व कॉमन अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. लोकशाही वाचवण्यासाठी १९७७ मध्ये असेच सर्व पक्ष एकत्र आले. सत्ताही आली. त्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला. त्यातून अनेक पक्ष फुटले. त्याची पुनरावृत्ती  होऊ नये. म्हणून आम्ही खबरदारी घेतोय. कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल हे ठरायला हवे. यासाठी आम्ही ३१ विषय आघाडीकडे सादर केले आहेत. त्यावर चर्चा होणार आहे.  यावर चर्चा होऊन निर्णय होईल. त्यानंतरच जागा वाटपावर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर व पूर्व विदर्भ अध्यक्ष माजी मंत्री रमेश गजबे उपस्थित होते.

शरद पवारांचे केवळ चिन्ह गेले लोकं त्यांच्यासोबतच

शरद पवार यांच्या पक्षाचे केवळ चिन्ह गेले, शरद पवार आहे तिथेच आहेत. नागरिकांना सर्व समजते. त्यामुळे लोक (मास) त्यांच्यासोबत आहे, असेही एड. आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर