शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

प्रीपेड स्मार्ट मीटरचा मुहूर्त टळला; ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होणार होते काम

By मोरेश्वर मानापुरे | Published: December 26, 2023 9:29 PM

कंपन्या आर्थिक संकटात; कंपन्यांकडे ९३ महिन्यांपर्यंत मीटर दुरुस्तीची जबाबदारी

कमल शर्मा / मोरेश्वर मानापुरे, नागपूर: राज्यातील २.४१ कोटी वीज ग्राहकांचे अस्तित्वातील जुने मीटर बदलवून त्या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेला प्रारंभीच ग्रहण लागले आहे. कंपन्या आर्थिक संकटात आल्याने ३१ डिसेंबरपर्यंत सुरू होणारे काम थांबले आहे. मीटर लावण्यासाठी एकूण १४ हजार ५४७ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. या चार कंपन्यांना ३१ डिसेंबरपर्यंत काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई वगळता उर्वरित राज्यात हा मुहूर्त टळला आहे. आता हे काम नवीन वर्षात ३१ मार्चपर्यंत सुरू होण्याचे बोलले जात आहे. यावर अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे.

कंपन्यांकडे ९३ महिन्यांपर्यंत मीटर दुरुस्तीची जबाबदारी

विरोधानंतरही महावितरणने भांडुप, कल्याण, कोकण, बारामती आणि पुणे येथे १.१६ कोटी मीटर बसविण्याचे काम अदानी पावरला दिले आहे. कंपनीने वीज वितरण करणाऱ्या मुंबईच्या या भागात मीटर बदलविणे सुरूही केले आहे. याशिवाय लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या भागात २७.७७ लाख नवे मीटर लावण्याचे काम एनसीसीला दिले आहे. हीच कंपनी नाशिक आणि जळगाव येथे २८.८६ लाख मीटर बसविणार आहे. दुसरीकडे जीनस कंपनीला अमरावती विभागात २१.७६ लाख आणि मोन्टी कार्लो कंपनीला नागपूर विभागात ३०.३० लाख मीटर बदलविण्याचे काम दिले आहे. या सर्व कंपन्यांमध्ये अदानी वगळता अन्य कंपन्या ३१ डिसेंबरची डेडलाईन पूर्ण करण्यास अपयशी ठरल्या आहेत.

या सर्व कंपन्यांना २७ महिन्यांत मीटर बसविणे आणि ९३ महिन्यांपर्यंत दुरुस्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.या कंपन्या आतापर्यंत मीटर बदलविण्याकरिता डाटा सेंंटर आणि जीपीएस सिस्टम यंत्रणा विकसित करण्यासह अन्य आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात अयशस्वी ठरल्या आहेत. संपूर्ण देशात स्मार्ट प्रीपेड मीटरची मागणी आहे. यामुळेच कंपन्यांसमोर समस्या उभ्या राहिल्या आहेत. शिवाय आर्थिक संकट आल्याचे बोलले जात आहे. ३१ डिसेंबरला पाच दिवस उरले आहे. त्यानंतरही मोन्टी कार्लो कंपनी आतापर्यंत कार्यालयही सुरू करू शकले नाही.

विदर्भात बदलले जाणार ५२ लाख मीटर

विदर्भात एकूण ५२ लाख ६ हजार ९८२ स्मार्ट मीटर बदलले जाणार आहेत. यामध्ये ट्रान्सफॉर्मर आणि फीडरमध्ये लागणाऱ्या मीटरचा समावेश आहे. सर्वाधिक ९ लाख ४५ हजार ६२३ मीटर नागपूर शहरात बसविण्यात येणार आहे. नागपूर ग्रामीणमध्ये ३ लाख ४४ हजार २२५, अकोला ३,८३,५२५, बुलढाणा ४,६७,२८३, वाशिम १,९२,१५१, अमरावती ६,३२,७६७, यवतमाळ ५,००९१०, चंद्रपूर ४,१४,६६७, गडचिरोली ३,२५,६७५, गोंदिया २,९८,३४७, भंडारा २,९१,८८३ आणि वर्धा येथे ३,९८,८०९ स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहे.

टॅग्स :electricityवीज