शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
3
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
4
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
5
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
6
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
7
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
8
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
9
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
10
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
11
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
12
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
13
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
14
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
15
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
16
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
17
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
18
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
19
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
20
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 

Corona Virus in Nagpur; घरी बाळंतपणाची तयारी अन् वडिल आहेत आजारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 5:41 PM

अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत.

ठळक मुद्देआशिष बैनलवार क्वॉरंटाईन सेंटरमधून रुग्णांची घेत आहेत काळजी

प्रवीण खापरे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक संकटाचा सामना करून विजयी पताका फडकावतो, तो योद्धा ठरतो. वर्तमान कोरोना महामारीच्या संकटात डॉक्टर्स असेच योद्धे म्हणून समाजापुढे उभे राहत आहेत. एकीकडे या युद्धात ते आघाडीवर आहेत आणि दुसरीकडे याच आघाडीवरील योद्धयांना आपमतलबी लोकांच्या दुष्ट प्रवृत्तीचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही ही वैद्यकीय आघाडी आपल्या कर्तव्यापासून जराही डगमगलेली नाही. संसर्गाच्या सावटातही ही आघाडी मैदानात दटून आहे आणि एखाद्या वॉरिअर प्रमाणे महाभयंकर अशा कोरोना नावाच्या सुक्ष्म दैत्याची दोन दोन हात करत अडिगतेने उभे आहेत. यापैकी काहींना तर एकाच वेळी दोन दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे. एक क्वॉरंटाईन सेंटर अन् दुसरे कुटूंब! तरी देखील ते जराही खजिल पडलेले नाही आणि या दोन्ही आघाड्या ते लिलया पेलत असल्याचे दिसून येते.शहरात कोरोनाचा जसा शिरकाव झाला तशा प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या. डॉक्टरांची फळीही उभी झाली आणि अल्पावधितच सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवासाला प्रमुख क्वॉरंटाईन सेंटर म्हणून घोषित करण्यात आले. या सेंटरमध्ये युद्धपातळीवर संशयितांना वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. याच कार्यात नागपूरचे युवा चिकित्सक डॉ. आशिष बैनलवार आहेत. त्यांच्यासारखे अनेक आहेत. डॉ. आशिष यांच्या पत्नी प्रेग्नंट असून, नववा महिना लागला आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे लवकरच एका रत्नाचे आगमन होणार आहे. तर त्यांचे वडील अपलॅस्टिक एनिमियाने ग्रस्त आहेत. या आजारात त्यांना सतत कृत्रित रक्तपुरवठा करावा लागतो. अशा स्थितीत पती म्हणून पत्नीची काळजी घेणे आणि एक पुत्र म्हणून वडिलांची देखरेख करणे, हे आद्य कर्तव्य आहे. शिवाय, त्यांना एक पाच वर्षाची मुलगी देखील आहे आणि तिच्याकडेही एक बाप म्हणून लक्ष पुरविणे आलेच. अशा स्थितीतही डॉ. आशिष आपल्या डॉक्टर या सर्वप्रथम कर्तव्याचे निर्वहन करत आहेत, हे विशेष आणि हिच बाब रुग्ण आणि लॉकडाऊनच्या काळात कायद्या धाब्यावर बसवणाऱ्यांनी जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. डॉ. आशिष हे १८ मार्चपासूनच या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये इतर सहकाऱ्यांसोबत आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉ. आशिष यांच्यासारखेच अनेक डॉक्टर एकाच वेळी दोन आघाड्या सांभाळत आपले कर्तव्य बजावत आहेत, हे विशेष.शासनाचे प्रोटोकॉल पाळा - आशिष बैनलवार: या स्थितीत नागरिकांनी शासनाशिवाय कुणाचेच प्रोटोकॉल पाळू नये. लॉकडाऊनचे पूर्ण पालन करा अन्यथा अंतिम प्रवासाला लागा, अशीच वर्तमान स्थिती आहे. अत्यंत मजबूत अशी वैद्यकीय क्षमता असलेल्या अमेरिका, इटली सारखे देश कोरोनापुढे हतबल झाले, ते आपण काहीच नाही. तरी देखील शासनाने लागलिच केलेल्या उपाययोजनांमुळे भारत अजूनही मजबूत आहे. त्याचा विचार करावा, असे आवाहन डॉ. आशिष बैनलवार यांनी क्वॉरंटाईन सेंटरमधून केले आहे.घरी जातो पण कुणाशीच भेटत नाही: दररोज घरी गेलो की आपल्या खोलित स्वत:ला बंद करून घेतो. वडील घरी आहेत, त्यांच्याकडे सतत लक्ष पुरवावेच लागते. दररोज रक्त बदलून घ्यावे लागते. पत्नीला माहेरी पाठवले आहे. मात्र, दररोज फोनवर बोलणे होत असते, असे डॉ. आशिष यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस