शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

उपराजधानीत सुरक्षा यंत्रणा सज्ज

By admin | Published: September 23, 2015 6:19 AM

याकूब मेमनच्या फाशीनंतर मिळालेल्या धमक्यांच्या अनुषंगाने सणासुदीच्या दिवसात उपराजधानीत घातपात किंवा जातीय

नरेश डोंगरे ल्ल नागपूरयाकूब मेमनच्या फाशीनंतर मिळालेल्या धमक्यांच्या अनुषंगाने सणासुदीच्या दिवसात उपराजधानीत घातपात किंवा जातीय दंगलीसारखा प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा दलाकडून खास खबरदारीच्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) बिपीनकुमार बिहारी येथे आले असून पुढचे आठ दिवस ते नागपुरातच तळ ठोकून राहणार आहे. या कालावधीत आत्मघाती हल्ला किंवा जातीय दंगलीसारखा कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीच्या कोणत्या उपाययोजना करायच्या त्यासाठी सुरक्षा यंत्रणा कामी लागली आहे.मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला नागपुरात फाशी देण्यात आल्यामुळे टायगर मेमनने थेट पाकिस्तानातूनच ‘अंजाम भुगतने को तय्यार रहो‘ अशी धमकी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानातून भारतात पाठविण्यात आलेल्या नावेदसह अनेक दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतरही अनेक दहशतवादी भारतात शिरल्याचा अंदाज आहे. दहशतवादी संघटनांचे स्लीपर आधीपासूनच देशातील विविध प्रांतात आणि मुंबई, दिल्लीसह अनेक महानगरात कार्यरत असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून घातपात घडवून आणण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी यापूर्वी अनेकदा वर्तविली आहे. सणोत्सवात जागोजागी गर्दी असते. अशा वेळी दहशतवाद्यांना त्यांचे इप्सित साध्य करणे शक्य होते. नागपूर अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर अव्वलस्थानी आहे. येथे याकूबला फाशी देण्यात आल्यापासून घातपाताचा धोका अधिकच वाढला आहे. गणेशोत्सवामुळे ठिकठिकाणी उसळणारी गर्दी लक्षात घेता उपराजधानीत घातपात घडवून आणण्याची तयारी दहशतवादी संघटनांनी चालविल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याची चर्चा आहे. गणेशोत्सवादरम्यानच ईद आल्यामुळे घातपात किंवा जातीय दंगलीचा धोका अधिक तीव्र असल्याचे बोलले जाते. त्याचमुळे राज्यातील सुरक्षा यंत्रणा खडबडून कामाला लागली आहे. या पार्श्वभूमीवर, एडीजी (अतिरिक्त पोलीस महासंचालक) स्पेशल आॅपरेशन, बिपीनकुमार बिहारी सोमवारी नागपुरात पोहचले. त्यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बैठका, चर्चा करून त्यांना आवश्यक ते निर्देश दिले. बुधवारी पुन्हा ते निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. दरम्यान, दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक कार्यालयातही मंगळवारी धावपळ होती. या संबंधाने प्रस्तुत प्रतिनिधीने एडीजी बिहारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘असे काहीही नाही‘ म्हटले. गर्दी अन् धोकासूत्रांच्या माहितीनुसार, २५, २६, २७ आणि २८ हे चार दिवस धोक्याचे आहेत. २५ ला ईद असून, २७ ला अनंत चतुर्दशी आहे. २७ आणि २८ ला विसर्जनाची धूम असते. या दोन दिवसांत मिरवणुका निघतात. विसर्जनाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होते. त्याचा गैरफायदा उचलून दहशतवादी आपल्या कलुषित मनसुब्यांना पूर्ण करण्याचे प्रयत्न करू शकतात. दयाल यांची दक्षताराज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राज्यात कोणती घातपाताची घटना घडली तर त्यांच्या कारकिर्दीवर ठपका लागेल. ते टाळण्यासाठी दयाल सर्वच प्रकारची दक्षता घेत आहेत. येथील पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांनी एडीजी बिहारी यांना पाठविल्याचेही वरिष्ठ अधिकारी सांगतात.