शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘मनोहर’ साहित्यसंघटक निवर्तला, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे निधन

By प्रविण खापरे | Updated: October 14, 2022 20:29 IST

गेल्या १६ वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या वयाची अर्ध्याहून अधिक वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या सेवेत घालवली आहेत.

नागपूर: कुशल साहित्यसंघटक म्हणून सर्वपरिचित असलेले विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ९० वर्षाचे होते. शनिवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, बहिण, भाऊ, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. 

गेल्या १६ वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी आपल्या वयाची अर्ध्याहून अधिक वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या सेवेत घालवली आहेत. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या स्वभावाने ते अनेकांची मने जिंकून घेत असत. त्याचमुळे, त्यांच्या निधनाने साहित्यसंघटन क्षेत्रातील ‘मनोहर’ व्यक्तिमत्त्व हरवल्याची शोककळा साहित्य वर्तुळात पसरली आहे.

मनोहर म्हैसाळकर हे दीर्घकाळापासून मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. याच आजारामुळे त्यांना गुरुवारी १३ ऑक्टोबराला एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. याच रुग्णालयात त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता अखेरचा श्वास घेतला.  प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर २००६ साली त्यांनी विदर्भ साहित्य संघाची धुरा आपल्या हाती घेतली. तेव्हापासून ते आजतागायत मनोहर म्हैसाळकर आणि विदर्भ साहित्य संघ एकमेकांना पर्याय झाले होते. मनोहर म्हैसाळकरांचे कार्य केवळ विदर्भ साहित्य संघापुरतेच मर्यादित नव्हते तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाशी संलग्नित बृहन्महाराष्ट्रातील सर्व संस्थांमध्ये त्यांचा पगडा होता. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन असो वा साहित्य संमेलनाचे अध्यक्षांची निवड असो, त्यांची भूमिका कायम निर्णायक ठरली आहे. त्यांचा हा दराराच विदर्भ साहित्य संघाला अग्रणी स्थान प्राप्त करवून देणारा ठरला आहे. त्यांच्या कार्याचा आवाका आणि साहित्यसंघटन कौशल्य बघूनच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांचा २०२१-२२चा ‘प्राचार्य राम शेवाळकर’ पुरस्कार देऊन गौरव केला होता. २००० साली अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेने त्यांना पहिल्या भाऊसाहेब स्मृती ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्काराने सन्मानित केले होते. १९९९ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेने त्यांना मराठी साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट व ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्काराने गौरवान्वित केले होते. २००६ साली त्यांना मानव मंदिर नागपूर या संस्थेने प्रकाश देशपांडे स्मृती कुशल संघटक पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय, त्यांना विविध संस्था, संघटनांकडून सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विदर्भासह महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर संदेश लिहीत आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.

टॅग्स :nagpurनागपूर