शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

तळागाळातील व्यक्तीपर्यंत मूलभूत सुविधा पोहचविणार : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 19:21 IST

समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देपंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा प्रारंभपात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वाटपधान्य वाटप आणि धूरमुक्त महाराष्ट्रासाठी गॅस कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजातील तळागाळातील व्यक्तीपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत असून, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.बचत भवन येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा आरंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ. समीर मेघे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, उपायुक्त (पुरवठा) रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी लीलाधर वार्डेकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थींना गॅस जोडणी व रेशन कार्डचे वाटप करण्यात आले.पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे म्हणाले, सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम आणि अधिक परिणामकारक करण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग काम करीत आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बदलामुळे प्रत्यक्ष लाभार्थ्याला मदत देता येत असून, नव्याने लाभार्थी जोडता येत आहेत. समाजातील तळागळातील व्यक्ती, वंचित घटकांपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचविण्यावर भर देण्यात येत आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातील तळागळातील लोकांना गॅस जोडणी व रेशन कार्ड उपलब्ध करून देण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. याबरोबरच सर्वांसाठी घरे, आयुष्यमान भारत यासारख्या योजनांद्वारेही जनसामान्यांना दिलासा देण्यात येत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे एक कुटुंब स्वावलंबी होण्यास हातभार लागतो, असे बावनकुळे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांना उज्ज्वला योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे अद्यापही रेशन कार्ड अथवा गॅस जोडणी नाही अशा पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले. सर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वितरण, सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना १०० टक्के धान्य वितरण तसेच सर्व कुटुंबांना १०० टक्के गॅस जोडणी (एलपीजी) वितरित करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे.यांना मिळणार लाभ, असे करा निवेदनसर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के शिधापत्रिका वितरणाकरिता विहित नमुन्यातील अर्ज, कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स, कुटुंबप्रमुख महिला सदस्याचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो, कुटुंबप्रमुखाच्या बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी पुरावा म्हणून घर टॅक्स पावती, वीज बिल, मतदान कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच वार्षिक उत्पन्न शहरी भागात राहणाऱ्यांना ५९ हजार रुपये, तर ग्रामीण भागात राहणाऱ्यांना ४४ हजार रुपयाच्या आत असलेल्यांना प्राधान्य. या योजनेचा लाभ मिळेल. जुन्या शिधापत्रिकेवर वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयाच्यावर असल्यास उत्पन्न कमी असल्याचे कुटुंबप्रमुखाचे हमीपत्र. विधवा, दुर्धर आजारग्रस्त, अपंग असल्यास त्यासंबंधीची कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्व पात्र कुटुंबांना १०० टक्के गॅस जोडणी (एलपीजी) देण्याकरिता कुटुंबातील सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स, कुटुंबप्रमुख महिला सदस्याचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो, कुटुंबप्रमुखाच्या बँक पासबुकची झेरॉक्स, शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत, विहित नमुन्यातील केवायसी अर्ज आवश्यक आहे. केवायसी अर्ज स्वस्त धान्य दुकानामध्ये मोफत उपलब्ध आहे.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय