शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

मनोरुग्णांनी फुलवले केळीचे बन, भाज्यांचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:11 AM

सुमेध वाघमारे नागपूर : तसे बहुतेक मनोरुग्ण गरीब, शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेतीशी जोडले तर ते लवकर बरे होतात. ...

सुमेध वाघमारे

नागपूर : तसे बहुतेक मनोरुग्ण गरीब, शेतकरी कुटुंबातील. त्यांना जनावरे, माती-शेतीशी जोडले तर ते लवकर बरे होतात. हा अनुभव लक्षात घेऊन याच अनुभवावर मागील काही वर्षांपासून त्यांच्या परिश्रमावर जवळपास पाच एकरवर केळी व भाज्यांचा मळा फुलला आहे.

एकदा रुग्ण मनोरुग्णालयात दाखल झाले की, अखेरच्या श्वासापर्यंत त्याचे आयुष्य दगडी भिंतीच्याआड जाते, असे बोलले जाते. परंतु, नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील चित्र वेगळे आहे. मनोरुग्णालयातील विविध सामाजिक उपक्रमांतून मनोरुग्णांना समाजाशी जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या रुग्णालयात पुरुष व महिला मिळून ४५०वर रुग्ण दाखल आहेत. यातील जवळपास ४० टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. यातील काही बरे झालेले व शेतीकामाची आवड असणाऱ्यांना हाताशी धरून त्यांना शेतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. मनोरुग्णालयातील सुमारे दोन एकरमध्ये भाजीपाला तर टाटा ट्रस्टच्या ‘उडाण’ या उपक्रमातून तीन एकरमध्ये केळीची बाग लावण्यात आली आहे. मागील तीन वर्षांत २९ हजार १७८ किलो विविध भाज्या व केळीचे उत्पादन घेतले आहे. सध्याच्या स्थितीत दोनवेळच्या जेवणासाठी लागणारी भाजी याच शेतीतून येत आहे. उरलेला भाजीपाला व फळे विक्रीसाठी पाठवून त्यातील मिळालेला पैसा रुग्णांच्या खात्यात जमा केला जात आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम ठरला आहे.

११५ मनोरुग्णांच्या परिश्रमाला आले यश

प्रादेशिक मनोरुग्णालयाचा पुढाकार, टाटा ट्रस्टचे सहकार्य आणि मनोरुग्णांच्या परिश्रमामुळे २०१८ मध्ये २७ रुग्णांनी मिळून मेथी, पालक, मुळा, गोडबाजी, टोमॅटो आणि पपई असे एकूण १४६५ किलोचे उत्पादन घेतले. २०१९ मध्ये ५३ मनोरुग्णांच्या प्रयत्नांतून ७३६ किलो तर २०२० मध्ये ३५ मनोरुग्णांच्या कष्टावर २६ हजार ९७७ किलोच्या केळीचे उत्पादन घेतले. या तीन वर्षांत ११५ मनोरुग्णांच्या परिश्रमातून २९ हजार १७८ किलो केळी व भाज्यांचे उत्पादन काढण्यात यश मिळाले. या उपक्रमाला मनोरुग्णांच्या मिळालेल्या प्रतिसादामुळे रुग्णालय प्रशासनच नाही तर रुग्णांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

रुग्णांच्या खात्यात ६३ हजार रुपये

शेतीतून मिळालेल्या केळी व भाज्यांच्या उत्पादनातून खर्च वगळता जो नफा शिल्लक राहतो तो शेतीमध्ये काम करणाऱ्या मनोरुग्णांच्या खात्यात जमा केला जातो. आतापर्यंत ६३ हजार ६० रुपये खात्यात जमा केले आहेत. बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांना या पैशांची मदत होत आहे.

शेतीच्या कामातून चार जणांचे पुनर्वसन

मनोरुग्ण असा शिक्का बसल्याने फार कमी नातेवाईक त्यांना रुग्णालयातून घेऊन जातात. अनेकवेळा नातेवाईकांनी दिलेले घराचे पत्तेही खोटे ठरतात. अशावेळी रुग्णांना दिलेले पुनर्वसनाचे प्रशिक्षण उपयोगी येत आहे. नुकतेच बरे झालेल्या चार रुग्णांना रुग्णालयाबाहेर शेतीच्या कामातून स्वत:ला उभे केले आहे. हेच रुग्णालयाचे खरे यश आहे.

- डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.