शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकाभिमुख अधिकारी : अश्विन मुद्गल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 13:25 IST

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर-२०१९ (उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी) साठी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नामांकन झाले आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर-२०१९ (उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी) साठी नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे नामांकन झाले आहे. एक पारदर्शी व लोकाभिमुख कारभारासह प्रयोगशील अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी नागपूर शहरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक वर्ष त्यांनी मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली. ते सध्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात शहरातील विकासकामांनी वेग घेतला आहे. प्रशासकीय कौशल्य, जनतेशी जुळलेली नाळ, कामाची हातोटी आणि सदैव कामासाठी तत्पर असलेले मुद्गल आदर्श अधिकारी म्हणून गणले जातात.मनपा आयुक्त असतांना त्यांनी शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी ‘न्युसन्स डिटेक्शन स्क्वॉड ’निर्माण केले. सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांना दंड आकारण्याचे काम हे पथक करायचे. त्यांच्याच कार्यकाळात केंद्र व राज्य सरकारने नागपूर शहराला ‘हागणदारी मुक्त’शहर घोषित केले. ‘स्वच्छ नागपूर’कडे शहराची वेगाने घौडदौड सुरू आहे. शहरातील गरजू व गरीब रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार मिळावे यासाठी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने २९ शहर प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण हाती घेण्यात आली आहे. यात त्यांनी पुढाकार घेतला आहे.जिल्हधिकारी म्हणून काम करतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवारवर अधिक लक्ष दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पांदण रस्ते बांधण्याचे नियोजन करून प्रत्येक तालुक्याला टार्गेट ठरवून दिले आहे. सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत नागपुरात प्रत्यक्ष बंधकामाला सुरुवात त्यांच्याचमुळे शक्य झाले आहे. त्यांच्याच नेतृत्वात आर्थिक स्थितीतून महापालिकेला बाहेर काढण्यासाठी थकीत कर वसुलीसाठी थकबाकीदारांना दंडाच्या रकमेत सूट देण्यासाठी ‘अभय योजना’ राबविण्यात आली. ७० टक्के मालमत्तांचे सर्वेक्षण करून कर निर्धारणाची ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. कारभारात पारदर्शता आणली. राज्य सरकार व महमंडळाकडे प्रलंबित असलेला महापालिकेचा निधी प्राप्त क रण्यासाठी प्रयत्न केले व त्यात यश मिळाले.गणेशोत्सवात शहरातील तलाव व नद्यांचे मोठ्याप्रमाणात प्रदूषण होते. याला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला. शहराच्या विविध भागात २०० कृत्रिम टँक तयार केले. अ‍ॅपच्या माध्यमातून विसर्जनाची घरपोच व्यवस्था करण्यात आली. यामुळे भाविकांची सुविधा झाली. सोबतच प्रदूषणालाही आळा बसला. दीक्षाभूमी येथील कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात. गर्दी विचारात घेता परिसराची स्वच्छता व उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केल्या.सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागपूर शहरात दररोज ४०० ते ४५० एमएलडी सांडपाणी निर्माण होते. यातील १३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. १३० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून महाजनकोला दिले जाते. यातून वर्षाला महापालिकेला १५ कोटी मिळतात. पुन्हा २०० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. आयुक्त म्हणून त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांनी या प्रकल्पाला गती मिळाली आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वीज निर्मिती प्रकल्पात वापर केला जााणार आहे. यातून महापालिकेला वर्षाला २० कोटींचे उत्पन्न होणार आहे. अशा प्रकारे सांडपाण्यातून वर्षाला ३५ कोटी मिळणार आहे.नियमित घेतात विकासकार्यांचा आढावाअश्विन मुद्गल यांच्या कार्यकाळात ‘स्मार्ट सिटी’चा महत्वाचा भाग असलेल्या शहरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांना गती मिळाली. कविवर्य सुरेश भट सभागृहाचे काम रखडले होेते. अश्विन मुदगल यांनी प्रत्येक आठवड्याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक घेऊ न अत्याधुनिक अशा सभागृहाचे काम पूर्ण केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. नागनदी प्रकल्प व ऑरें सिटी स्ट्रीट  प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरूवात केली जाणार आहे. शहरातील महापालिके च्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटप केले जाणार आहे. ते प्रत्येक विकासकामात जातीने स्वत: लक्ष घालतात व नियमितपणे विकासकार्यांचा आढावा घेतात.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट