शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

नागपूर विद्यापीठाचा निर्णय : ५० टक्के परीक्षांची जबाबदारी राहणार महाविद्यालयांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 11:53 AM

हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देप्राध्यापकांवरील ताण वाढणार, विद्यापीठाचे ओझे हलके

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षांबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ५० टक्के परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे देण्यात आली आहे. २०२१-२२ च्या पहिल्या सत्रापासून याची अंमलबजावणी होणार असून, २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयांनाच घ्याव्या लागणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली असून, यामुळे विद्यापीठाचे ओझे हलके होणार आहे, तर दुसरीकडे महाविद्यालयांतील प्राध्यापकांवरील ताण वाढणार आहे.

डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे कुलगुरू असताना ५०-५० परीक्षांचा फॉर्म्युला त्यांनी प्रस्तावित केला होता. परंतु त्याला महाविद्यालयांचा विरोध झाला होता. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुढाकार घेतला व ९ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव संमत करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेनेदेखील हिरवी झेंडी दिली होती. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे.

यानुसार या सत्रापासून पहिल्या सत्राच्या परीक्षा महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत. हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. राज्य शासनाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांचे प्रवेश होत नाहीत, अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा या पद्धतीने होणार आहेत. यासंदर्भातील विस्तृत नियमावली लवकरच जारी करण्यात येईल, असे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयांमध्ये नाराजीचा सूर

विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये नाराजीचा सूर आहे. अगोदरच अनेक ठिकाणी प्राध्यापकांची कमतरता आहे. त्यातच वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणे, विविध समित्यांच्या दौऱ्याची तयारी करणे व इतर प्रशासकीय कामांत प्राध्यापक पूर्णत: व्यस्त असतात. अशा स्थितीत परीक्षादेखील घेण्याची जबाबदारी आली, तर ताण वाढणार असल्याची भावना एका मोठ्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. प्राचार्य फोरम यासंदर्भात प्राध्यापकांची बाजू उचलून धरेला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्यापीठाकडे परीक्षा घेण्याचेच काम होते. आता तेदेखील ५० टक्क्यांनी कमी होणार असेल तर ते त्यांच्या सोयीचेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून परीक्षा

बीए. बीएस्सी, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीसीए, बीए (आरएस), बीएस्सी (गृहविज्ञान), बीएस्सी (आयटी), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीसीटी, बीएफडी, बीआयडी, बीटीएस, बीजेडी, बीएस्सी (फायनान्स), बीव्होक, बीएसडब्लू, बी.लिब. व इतर

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ