शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूर विद्यापीठाचा निर्णय : ५० टक्के परीक्षांची जबाबदारी राहणार महाविद्यालयांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 12:04 IST

हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देप्राध्यापकांवरील ताण वाढणार, विद्यापीठाचे ओझे हलके

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षांबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ५० टक्के परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे देण्यात आली आहे. २०२१-२२ च्या पहिल्या सत्रापासून याची अंमलबजावणी होणार असून, २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयांनाच घ्याव्या लागणार आहेत. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली असून, यामुळे विद्यापीठाचे ओझे हलके होणार आहे, तर दुसरीकडे महाविद्यालयांतील प्राध्यापकांवरील ताण वाढणार आहे.

डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे कुलगुरू असताना ५०-५० परीक्षांचा फॉर्म्युला त्यांनी प्रस्तावित केला होता. परंतु त्याला महाविद्यालयांचा विरोध झाला होता. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी पुढाकार घेतला व ९ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव संमत करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी व्यवस्थापन परिषदेनेदेखील हिरवी झेंडी दिली होती. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे.

यानुसार या सत्रापासून पहिल्या सत्राच्या परीक्षा महाविद्यालयांना घ्यायच्या आहेत. हिवाळी २०२२ पासून पहिल्या व तिसऱ्या तर २०२३ पासून सर्व विषम सत्रांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्यालयांना करावे लागणार आहे. राज्य शासनाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ज्यांचे प्रवेश होत नाहीत, अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षा या पद्धतीने होणार आहेत. यासंदर्भातील विस्तृत नियमावली लवकरच जारी करण्यात येईल, असे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयांमध्ये नाराजीचा सूर

विद्यापीठाच्या या निर्णयावरून महाविद्यालयांमध्ये नाराजीचा सूर आहे. अगोदरच अनेक ठिकाणी प्राध्यापकांची कमतरता आहे. त्यातच वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणे, विविध समित्यांच्या दौऱ्याची तयारी करणे व इतर प्रशासकीय कामांत प्राध्यापक पूर्णत: व्यस्त असतात. अशा स्थितीत परीक्षादेखील घेण्याची जबाबदारी आली, तर ताण वाढणार असल्याची भावना एका मोठ्या महाविद्यालयातील प्राचार्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. प्राचार्य फोरम यासंदर्भात प्राध्यापकांची बाजू उचलून धरेला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्यापीठाकडे परीक्षा घेण्याचेच काम होते. आता तेदेखील ५० टक्क्यांनी कमी होणार असेल तर ते त्यांच्या सोयीचेच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांकडून परीक्षा

बीए. बीएस्सी, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीसीए, बीए (आरएस), बीएस्सी (गृहविज्ञान), बीएस्सी (आयटी), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीसीटी, बीएफडी, बीआयडी, बीटीएस, बीजेडी, बीएस्सी (फायनान्स), बीव्होक, बीएसडब्लू, बी.लिब. व इतर

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ