शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

जन आरोग्य योजनेला पुन्हा मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:51 IST

सुधारित जन आरोग्य योजना लवकरच कार्यान्वित होईल, असे सांगितले जात असले तरी शासनाने पुन्हा एकदा तीन महिन्यासाठी जुन्याच योजनेला मुदतवाढ दिली.

ठळक मुद्देसुधारित महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रतीक्षा कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना गोरगरीब रुग्णांसाठी आणखी फायद्याची व्हावी, यासाठी २०१७ मध्ये योजनेचे नाव बदलविले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हे नाव दिले. मात्र याजेनेत फारसे बदल केले नाहीत. सुधारित जन आरोग्य योजना लवकरच कार्यान्वित होईल, असे सांगितले जात असले तरी शासनाने पुन्हा एकदा तीन महिन्यासाठी जुन्याच योजनेला मुदतवाढ दिली.दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेत ३० प्रमुख शस्त्रक्रियांसह तब्बल ९७१ आजारांचा समावेश केला. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष १ लाख ५० हजार रुपयांची विमा संरक्षणाची रक्कम दिली जात होती. या योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपणार होती. तत्कालीन सरकारने या योजनेचे नाव बदलविण्याचा व गोरगरीब रुग्णाभिमुख ही योजना करण्याचा निर्णय घेतला. तशी घोषणाही केली. यात विमा संरक्षणाची रक्कम ५० हजाराने वाढवून ती दोन लाख करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ एप्रिल २०१७ पासून जुन्या योजनेच्या नावात बदल करून ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ नाव दिले. परंतु विम्याच्या रकमेत वाढ केली नाही. नव्या ३२९ आजारांचा समावेश केला असला तरी, या आजारावर केवळ शासकीय रुग्णालयातच उपचार घेता येईल, ही अट टाकली. दरम्यानच्या काळात या योजनेचे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्न करण्यात आले. परंतु दोन्ही योजना एकत्रितपणे राबविण्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची मुदतवाढ ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपुष्टात आली. यामुळे नव्या वर्षात सुधारित जन आरोग्य योजना सुरू होण्याची शक्यता होती. परंतु पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. यामुळे गोरगरीब रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देते कोण, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.वारंवार मुदतवाढच‘राजीव गांधी’ योजनेची मुदत १ ऑक्टोबर २०१६ रोजी संपणार होती व २ ऑक्टोबरपासून महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू होणार होती. परंतु, जुन्या योजनेला २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली, नंतर त्यात पुन्हा वाढ करून मुदत ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढविली. शासनाने या जुन्या योजनेत खंड पडू न देता १ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने ही योजना सुरू ठेवली. १ एप्रिल २०१७ ते ३० जून २०१७ पर्यंत, नंतर ३० जून ते १ जुलै, नंतर १ जुलै ते ३० सप्टेंबर, ३० सप्टेंबर ते ३१ डिसेंबर, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आणि आता १ जानेवारी ते ३१ मार्च २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार