शहरं
Join us  
Trending Stories
1
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
2
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
3
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
4
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
5
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
6
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?
7
"बाप-बेटे हल्ली दारोदारी फिरतात, दारावर टक-टक करुन..."; आशिष शेलारांचे ठाकरे पिता-पुत्रांवर टीका
8
हरयाणा निकालामुळे भाजपाचं कमबॅक, मविआत संघर्ष; ठाकरेंचेही सूर बदलले, पडद्यामागचं राजकारण?
9
माधुरी की विद्या? नक्की कोण आहे मंजुलिका? कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैय्या ३' चा ट्रेलर रिलीज
10
जम्मू-काश्मिरमध्ये इंडिया आघाडीचे अवघे दोन हिंदू उमेदवार जिंकले, कोण आहेत ते? एकाने नोंदवला धक्कादायक निकाल  
11
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात चांदी ₹२१२२ स्वस्त; Gold किती घसरलं?
12
₹६७ च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ८ टक्क्यांची तेजी, एक घोषणा आणि स्टॉक सुस्साट
13
हरयाणातील गोहानाच्या जिलेबीची 'तारीफ' राहुल गांधींना महागात पडली! काय म्हणाला दुकानदार?
14
वकिलांकडून भाजपच्या आमदाराला पोलिसांसमोरच मारहाण; अर्बन बँक निवडणुकीतला प्रकार
15
राहुल गांधींनी मानले सर्व कार्यकर्त्यांचे आभार; हरयाणातील पराभवावर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...
16
मुंबईतील हिंदी बहुल १२ मतदारसंघात परप्रांतीय उमेदवाराला प्राधान्य द्या; मविआला पत्र
17
"काँग्रेसच जिंकणार असं दाखवलं जात होतं...", हरयाणा निवडणुकीवर द ग्रेट खलीची प्रतिक्रिया
18
बापरे! होणारा नवरा सतत करायचा कॉल; मुलीने ब्लॉक करताच 'त्याने' केलं असं काही...
19
गुरु-शुक्र समसप्तक योग: ७ राशींना दसरा शुभ, मालामाल व्हाल; दिवाळीला धनलक्ष्मी प्रसन्न होईल!
20
5 लाखातून उभे केले 7000 कोटींचे साम्राज्य! Phanindra Sama चे स्टार्टअप काय?

वीज दरवाढीचा पुन्हा बसणार झटका; महावितरण नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2022 8:30 AM

Nagpur News महावितरणने ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात वीज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दोन वर्षांनंतर इंधन समायोजन शुल्काची (एफएसी) पुन्हा वसुली सुरू केली आहे.

कमल शर्मा

नागपूर : महावितरणने ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात वीज महाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर दोन वर्षांनंतर इंधन समायोजन शुल्काची (एफएसी) पुन्हा वसुली सुरू केली आहे. आता कंपनी पुन्हा नागरिकांना महागड्या विजेचा झटका देण्याच्या तयारीत आहे. याकरिता बहुवार्षिक दर याचिकेत संशोधनासाठी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वीज नियामक आयोग आता विजेचे दर पाच वर्षांसाठी निश्चित करतात. याकरिता महावितरण याचिका दाखल करून संपूर्ण हिशोब देऊन दरवाढीची मागणी करतात. आयोग विभागीय आयुक्तालय असलेल्या शहरांमध्ये जनसुनावणी करून दर निश्चित करतात. आयोगाने ३० मार्च २०२० रोजी दर निश्चित केले होते. आता अडीच वर्षांपर्यंत संशोधनाची मागणी होऊ शकत नाही. हा कालावधीत ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, या पार्श्वभूमीवर दरवाढीच्या मागणीसंदर्भात कंपनीने याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. एकूणच पाहता वीज कंपन्या प्रत्येक पैलूंवर अयशस्वी ठरल्या आहेत. त्याचा भार सर्वसामान्यांवर पडणार आहे.

काय आहेत कारणे?

-ग्राहकांवर मोठ्या प्रमाणात थकीत. अनेक मोहिमेनंतरही कंपनीची एकूण थकीत रक्कम ६० हजार कोटींपेक्षा जास्त.

- आर्थिक स्थितीच्या कारणाने वीज कंपन्यांनी घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याज.

- कोळसा संकटामुळे वीज एक्स्चेंजकडून ९ रुपये प्रति युनिटपेक्षा जास्त दराने वीज खरेदी.

- कोळसा संकटामुळे इंडोनेशियातून अडीचपट दरात कोळशाची आयात.

- कोराडी वीज केंद्रातील लेटलतिफीमुळे डिसेंबरपासून दरमहा लागणारा ७२ कोटींचा दंड.

- महाजेनकोवर कोळसा कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे थकीत.

- वीज वितरण पद्धतीच्या पायाभूत विकास योजनेत वाढलेली गुंतवणूक.

एफएसी वसुली सुरू ठेवण्यासाठी याचिका

आयातीत कोळसा आणि वीज एक्स्चेंजकडून महागडी वीज खरेदी करण्यात येत असल्यामुळे महावितरण आता प्रतियुनिट ५ पैसे ते २५ पैशांपर्यंत इंधन समायोजना शुल्क वसूल करीत आहे. नियामक आयोगाने हे शुल्क तीन महिने वसूल करण्याची परवानगी दिली आहे. हा कालावधी आणखी तीन महिने वाढविण्यासाठी कंपनीने आयोगासमोर याचिका दाखल केली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण