शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

..मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2022 12:49 PM

सामान्य व्यक्तीने फसवणूक केल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते. मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, असे ॲड. मिर्झा म्हणाले.

नागपूर :राजकारणातील घोडेबाजार थांबविण्यासाठी दलबदलू नेत्यांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

जनमंच या सामाजिक संस्थेच्या वतीने माजी न्यायमूर्ती अशोक देसाई यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त शंकरनगर येथील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहामध्ये 'राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांमधील घोडेबाजार' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे अध्यक्षस्थानी तर, जनमंचचे अध्यक्ष राजीव जगताप, उपाध्यक्ष मनोहर रडके व दादासाहेब झोडे व्यासपीठावर उपस्थित होते.

नेत्यांनी एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे हा केवळ दिवाणी वा राजकीय मुद्दा नाही, हा फौजदारी गुन्हादेखील आहे. मतदार पक्षाचे धोरण पाहून उमेदवाराला निवडून देतात. त्यामुळे संबंधित उमेदवार वैयक्तिक स्वार्थासाठी पक्ष बदलतो तेव्हा, मतदारांची फसवणूक होते. परिणामी, अशा उमेदवाराला कारावासाची शिक्षा होणे गरजेचे आहे. त्याकरिता कायदा तयार केला गेला पाहिजे. संबंधित उमेदवाराला केवळ अपात्र ठरवून काहीही साध्य होणार नाही. सामान्य व्यक्तीने फसवणूक केल्यानंतर त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाते. मग दलबदलू नेत्यांकरिता शिक्षेचा कायदा का नाही, असे ॲड. मिर्झा म्हणाले.

राज्यसभा व विधान परिषदेमध्ये लोकसभा व विधानसभेतील पक्षनिहाय संख्येच्या प्रमाणात त्या-त्या पक्षाचे प्रतिनिधी पाठविणे, हादेखील घोडेबाजार थांबविण्याचा प्रभावी उपाय होऊ शकतो. हा उपाय अंमलात आणण्याकरिता सर्वांनी एकजूट होऊन आवाज उचलणे आवश्यक आहे, असेही ॲड. मिर्झा यांनी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार वेंद्र गावंडे यांनीसुद्धा राजकारणातील घोडेबाजारावर प्रहार केला. मतदार पक्ष केंद्रित होण्याऐवजी व्यक्तीकेंद्रित झाले आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SocialसामाजिकPoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ