शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

वीज बिलाचा दिलासा दोन हजार कोटीसाठी अडकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 10:34 PM

लॉकडाऊनच्या काळातील भरभक्कम वीज बिलापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. नागरिकांनाही त्याची प्रतीक्षा आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतरही यावर ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही.

ठळक मुद्दे राज्य सरकारची घोषणा कधी पूर्ण होणार : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतरही निर्णय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळातील भरभक्कम वीजबिलापासून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली. नागरिकांनाही त्याची प्रतीक्षा आहे. परंतु राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतरही यावर ठोस निर्णय घेऊ शकलेले नाही. दिलासा देण्यासाठी वीज कंपन्यांनी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तिजोरी उघडली तरच सामान्य नागरिकांना वीज बिलातून दिलासा मिळेल, हे स्पष्ट आहे. तेव्हा सध्यातरी वीज बिलाचा दिलासा हा दोन हजार कोटी रुपयांसाठी अडकून आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऊर्जामंत्री व वीज अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर अशी घोषणा केली होती की, राज्य सरकार लॉकडाऊन काळात एकाचवेळी आलेल्या वीज बिलापासून नागरिकांना दिलासा देण्यावर विचार करीत आहे. ऊर्जामंत्री राऊत यांनीही सरकार नागरिकांच्या मदतीसाठी कटीबद्ध असल्याचे जाहीर केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार होता. परंतु पाच आठवड्यानंतरही राज्य सरकार यावर निर्णय घेऊ शकलेले नाही.सूत्रानुसार घोडे निधीसाठी अडकले आहे. वीज कंपन्यांनी जो प्रस्ताव पाठवला आहे त्यानुसार १८०० ते २००० कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या निधीमुळे राज्य सरकार दुविधेत आहे. दुसरीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, यासंदर्भात सरकारलाच निर्णय घ्यायचा आहे. सरकारने निधी दिला तरच वीज बिलांमध्ये दिलासा दिला जाऊ शकतो. ऊर्जा मंत्रालयातील सूत्रानुसार मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वीही दिलासा देण्याची घोषणा नाकारण्यात आलेली नाही.१०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ होऊ शकतेराज्य सरकारने दिलासा देण्याची घोषणा केली. तो दिलासा नेमका काय असेल याबाबत असे सांगितले जाते की, यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ होऊ शकते. १०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर ५० टक्के आणि ३०१ पेक्षा अधिक वापराच्या युनिटवर २५ टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. दुसºया एका प्रस्तावात १०० युनिटपर्यंतचे वीज बील माफ करणे आणि एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन दरावर सध्या रोख लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.असा मिळणार होता दिलासाराज्य सरकारने वीज बिलात दिलासा देण्याची घोषणा केली. त्यासंदर्भात काही शिफारस करण्यात आली होती. यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणे, १०१ ते ३०० युनिटपर्यंतचे दर ५० टक्के आणि ३०१ पेक्षा अधिक वापराच्या युनिटवर २५ टक्के सूट. तसेच एप्रिलपासून लागू झालेल्या नवीन दरावर सध्या रोख लावण्याची शिफारस करण्यात आली आहे. परंतु आता हा प्रस्तावच थंडबस्त्यात टाकण्यात आला आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल