शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 21:50 IST

कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन विदर्भ कोतवाल संघाच्या मोर्चाने विधिमंडळावर पहिल्याच दिवशी धडक दिली.

ठळक मुद्देविदर्भ कोतवाल संघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा, या मुख्य मागणीला घेऊन विदर्भ कोतवाल संघाच्या मोर्चाने विधिमंडळावर पहिल्याच दिवशी धडक दिली. विदर्भातून सहभागी झालेल्या या मोर्चेकरांचे एक शिष्टमंडळ महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटले. त्यांनी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. परंतु मोर्चेकरांनी लेखी आश्वासन दिल्यावरच जागा सोडणार, असा निर्धार केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आमदार विनोद अग्रवाल यांनी मोर्चाला भेट दिली. मागण्यांसाठी लवकरच बैठक लावली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतरच मोर्चा माघारी परतला.राज्यात १० हजारावर कोतवाल आहेत. पाच हजार रुपये मानधन आणि १० रुपये चप्पल भत्ता मिळतो. एवढ्या पैशांमध्ये जगायचे कसे, हा प्रश्न आहे. गेल्या ६९ वर्षांपासून शासनदरबारी कोतवाल न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, परंतु कुणीच लक्ष देत नसल्याची खंत विदर्भ कोतवाल संघचे रवींद्र बोदेले यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कोतवाल हा क्षेत्रीयस्तरावर गावातील तसेच शहरातील महसूल यंत्रणेचा प्रमुख घटक आहे. शासन आणि जनतेतील अतिशय जवळचा विश्वासू कर्मचारी आहे. ते शासनाची २४ तास सेवा करतात. ते चतुर्थ श्रेणीस पात्र आहेत. यामुळे शासनाने सकारात्मकपणे या मागणीकडे पाहावे, असेही ते म्हणाले.नेतृत्वमोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष रवींद्र बोदेले, कार्याध्यक्ष मंगेश जांभुळकर, सरचिटणीस दीपक रेवतकर, कविता ठवरे आदींनी केले.मागण्याकोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करा.कोतवालातून तलाठी व तत्सम पदासाठी २५ टक्के पदोन्नती द्या.सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन व वारसांना सेवेत संधी द्या.समान काम, समान वेतन या निर्णयाची अंमलबजावणी करा.

टॅग्स :Morchaमोर्चाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन