शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

दाेन एकरातील साेयाबीनवर फिरविला राेटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:16 AM

लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढाला : साेयाबीनच्या पिकावर सुरुवातीला खाेडमाशी या किडीचा आणि नंतर येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मेंढाला : साेयाबीनच्या पिकावर सुरुवातीला खाेडमाशी या किडीचा आणि नंतर येल्लाे माेझॅक या विषाणूजन्य राेगाचा प्रादुर्भाव झाल्याने वासुदेव दंढारे, रा. वाढाेणा, ता. नरखेड येथील शेतकऱ्याचे दाेन एकरातील पीक पूर्णपणे नष्ट झाले. या दाेन एकरात मूठभर साेयाबीनचे उत्पादन हाेण्याची शक्यता मावळल्याने शेतकऱ्याने शेतातील संपूर्ण साेयाबीनचे पीक राेटाव्हेटर फिरवून काढून टाकले.

यासंदर्भात वासुदेव दंढारे यांनी सांगितले की, साेयाबीनचे पीक दिवाळीआधी येत असल्याने तसेच त्याचा उत्पादन खर्च कमी असल्याने आपण यावर्षी दाेन एकरात साेयाबीनची पेरणी केली हाेती. सुरुवातीला पिकाची अवस्था चांगली हाेती. मात्र, नंतर खाेडमाशीचा प्रादुर्भाव झाला. खाेडमाशी नियंत्रणात आणण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. फलधारणा व्हायला सुरुवात हाेताच येल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव झाला. हा राेग नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा महागड्या औषधांची फवारणी केली. मात्र, काहीही उपयाेग झाला नाही. उलट, संपूर्ण पीक पिवळे पडायला लागले. दाेन एकरात पायलीभर साेयाबीन हाेणार नसल्याने संपूर्ण पीक राेटाव्हेटरने काढून टाकण्याचा निर्णय घेतला, असेही वासुदेव दंढारे यांनी सांगितले.

वातावरणातील प्रतिकूल बदल, पावसाची अनियमितता, सततचे दमट वातावरण यासह अन्य कारणांमुळे पीक कीड व राेगाला बळी पडले, अशी माहिती कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी दिली. असाच प्रकार नरखेड तालुक्यातील मेंढला, वाढोणा, रामठी, हिवरमठ, आरंभी, उदापूर, बानोर (चंद्र), दावसा, थडीपवनी, अंबाडा, सायवाडा, ताराउतारा, खलानगोदी, साखरखेडा, सिंजर, वडविहिरा, दातेवाडी, उमठा या शिवारात आढळून येताे. हातचे पीक गेल्याने शासनाने या संपूर्ण भागातील कीड व राेगग्रस्त साेयाबीनच्या पिकाचे सर्वेक्षण करून याेग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

...

कालबाह्य झालेले बियाणे

राेग व किडींना कायम नियंत्रणात आणणे शक्य नाही. कीड व राेगांपासून पिकांना वाचविण्यासाठी माेठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने एकीकडे उत्पादन खर्च वाढताे. बाजारात रास्त भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी ताेटाच पडताे. हल्ली आपल्या देशात वापरले जाणारे बहुतांश पिकांचे बियाणे कालबाह्य झाले आहेत. जगात किडी व राेगांना प्रतिबंधक असलेले बियाणे उपलब्ध आहे. केंद्र शासनाने त्या बियाण्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. शासनाने ही बंदी उठवून शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले ‘जीएम’ (जेनेटिकली माॅडिफाईड) बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मदन कामडे, रामचंद्र बहुरूपी, वसंतराव वैद्य, परीक्षित चरपे, संदीप सेंबेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

नुकसान भरपाई हा उपाय नाही

मागील चार वर्षापासून साेयाबीनचे पीक खाेडमाशी व येल्लाे माेझॅकमुळे उद्ध्वस्त हाेत आहे. दरवर्षी पिकाचे नुकसान हाेते व राजकीय नेत्यांद्वारे त्याचे राजकारण करीत नुकसान भरपाईची मागणी केली जाते. किडी व राेगांमुळे पिकांच्या हाेणाऱ्या दरवर्षीच्या नुकसानीवर नुकसान भरपाई हा उपाय नाही. त्यामुळे शेतकरी व त्यांच्या शेतातील पिके वाचविण्यासाठी शासनाने यावर कायमस्वरूपी उपाययाेजना करावी, अशी मागणीही नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.