शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

ग्रामीण महिला सक्षमीकरणाची ‘उमेद’ वाऱ्यावर, मानधन थकले; ७ दिवसांपासून नागपुरात उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:09 AM

पोटापाण्याबरोबरच महिला सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर; वर्धा जिल्ह्यातील ४२ प्रभाग संघ व्यवस्थापिकांचे संविधान चौकात उपोषण

नागपूर : ग्रामीण भागातील महिलांचे बचतगट तयार करून त्यांच्या हाताला कामे देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जाते. या अभियानाचा पायलट प्रोजेक्ट २००८ मध्ये वर्धा जिल्ह्यातून सुरू झाला. त्याला ‘उमेद’ असे नाव देण्यात आले. या उमेदमध्ये कार्यरत असलेल्या प्रभाग संघ व्यवस्थापिकांचे मानधन शासनाच्या धोरणामुळे अडचणीत आले आहे. तुटपुंजा मानधनासाठी वर्धा जिल्ह्यातील ४२ व्यवस्थापिका गेल्या ७ दिवसांपासून संविधान चौकात दिवसरात्र उपोषणावर बसल्या आहेत. कुटुंब सोडून उघड्यावर उपोषणावर बसलेल्या या महिलांना पोटापाण्याबरोबरच सुरक्षेचाही प्रश्न भेडसावत आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रात जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्हा या अभियानाचा पायलट प्रोजेक्ट आहे. यात कार्यरत असलेल्या ४२ प्रभाग संघ व्यवस्थापिकांनी १४ हजार महिला बचतगट जिल्ह्यात तयार केले आहेत. त्यांना सक्षम करण्याचे कार्य या महिला करीत आहेत. त्या मोबदल्यात त्यांना १० हजार रुपये मानधन मिळत होते. परंतु २०२२ च्या अखेरपासून या महिलांची मानधन वितरणाची पॉलिसी शासनाने बदलविली. आता त्यांना अभियानातून मानधन सरकार देणार नसून, महिला बचत गटाच्या प्रभाग संघातूनच त्यांना मानधन काढायचे आहे. परंतु प्रभाग संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने या महिलांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या या प्रोजेक्टला २०२७ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पण या महिलांच्या मानधनाचे वांधे झाले आहेत. युवा परिवर्तन की आवाजचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात या महिला उपोषणाला बसल्या आहे.

- उपेक्षेबरोबर वेदनाही

वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून असलेल्या या महिला कुटुंब सोडून ७ दिवसांपासून संविधान चौकात रस्त्यावर आहेत. रात्रीच्या बोचऱ्या थंडीत रस्त्यावरच रात्र काढत आहे. महिलांना प्रातर्विधीच्या समस्या भेडसावत आहे. कुठल्यातरी एका पोलिसाने अभद्र भाषेत त्यांच्यावर चिखलफेक केली. रविवारी तर सकाळपासून त्यांची जेवणाची सोय नव्हती. अखेर पोलिसांनीच रात्रीला त्यांच्या जेवणाची सोय केली. कुटुंबाला आधार व्हावा यासाठी दोन पैशासाठी मोठ्या उमेदीने दिवसरात्र काम करणाऱ्या या महिलांची शासनाकडून उपेक्षा होत असल्यामुळे त्या रस्त्यावर आल्या, पण रस्त्यावरही कुचंबना आणि वेदना त्यांना सहन कराव्या लागत असल्याची भावना दीपमाला तिजारे, शालिनी पाटील, शीला घोरपडे, वंदना राऊत, सुनीता केचे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Womenमहिलाagitationआंदोलनnagpurनागपूरwardha-acवर्धाGovernmentसरकारStrikeसंप