शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

नागपुरातील 'एनडीआरएफ' अकादमीत सार्क देशांनाही प्रशिक्षण : अमित शाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 20:42 IST

नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. या अकादमीमध्ये केवळ देशातीलच नव्हे तर दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल.

ठळक मुद्देराष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय देशाला समर्पित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात भव्य व अत्याधुनिक अशी एनडीआरएफची (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) अकादमी उभारण्यात येत आहे. ही आशिया खंडातील एकमेव अशी अकादमी आहे. या अकादमीमध्ये केवळ देशातील नागरिकांनाच नव्हे तर दक्षिण आशियातील सार्क देशांमधील नागरिकांनाही अत्याधुनिक प्रशिक्षण दिले जाईल, त्यामुळे ती सार्क देशांसाठीही फायद्याची ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे व्यक्त केला. 

राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयातील नवनिर्मित परिसर गुरुवारी राष्ट्राला समर्पित व एनडीआरएफ अकादमीची स्थापना करताना ते बोलत होते. यावेळी अग्निशमन शौर्य पदकांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, तसेच गृह मंत्रालयांतर्गत असलेल्या अग्निशमन सेवा व व नागरिक सुरक्षा विभागाचे महानिदेशक एम. नागेश्वर राव, एस.एस. प्रधान, संजीवकुमार जिंदल प्रामुख्याने उपस्थित होते. 
अमित शाह म्हणाले, सध्या अग्निशमन विभाग आणि एनडीआरएफची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण झाली आहे. अलीकडे देशात तीन मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या. यात लोकांचे जीव आणि संपत्तीच्या संरक्षणात एनडीआरएफने महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्वी अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये १० हजारावर लोकांचे बळी जात होते. परंतु आता तसे राहिले नाही. अत्याधुनिक प्रशिक्षणयुक्त देशातील एनडीआरएफ अतिशय मजबुतीने आपत्ती निवारणाचे कार्य करीत आहे. कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास एनडीआरएफ तात्काळ पोहोचते. हे काम केवळ चार वर्षात झाले हे विशेष. आपत्ती निवारण आणि अग्निशमन विभाग हे दोन्ही विभाग गेली ७० वर्षे दुर्लक्षित राहिले. अग्निशमन हा राज्यांचा विषय आहे. राज्यांनीही तो महापालिकेच्या भरवशावर ठेवला. त्यामुळे हे विभाग कायमस्वरुपी दुर्लक्षित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये या दोन्ही विभागाला मजबूत करण्यासाठी पुढाकार घेतला. केवळ चार वर्षात एनडीआरएफ देशभरात पसरले. आज प्रत्येक राज्यात एक नैसर्गिक आपत्ती निवारण फोर्स तयार आहे. जिल्हा स्तरावरही ही चमू तयार होत आहे. अतिशय चांगले काम करीत असलेल्या एनडीआरएफमध्ये आणखी चार बटालियनचा समावेश करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,आंतरिक व बाह्य सुरक्षेसोबतच जानमालाची सुरक्षाही महत्त्वाची आहे. हेच कार्य अग्निशमन विभाग व एनडीआरएफ करते.यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, देवेंद्र फडणवीस, एस.एन. प्रधान यांनीही आपले विचार व्यक्त केले. एम.नागेश्वर राव यांनी प्रास्ताविक केले. तर जी.एस. सैनी यांनी आभार मानले.भूमिपूजन आणि उद्घाटन आम्हीच करतोराष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे काम अनेक वर्षे रेंगाळले. याचा हा धागा पकडत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, कॉग्रेसच्या काळात एखाद्या प्रकल्पाचे किंवा संस्थेचे कार्य वर्षानुवर्षे चालायचे. भूमिपूजन एक सरकार करायचे. निधी दुसरे सरकार द्यायची, काम तिसऱ्या सरकारमध्ये सुरू व्हायचे आणि उद्घाटन चौथ्या सरकारमध्ये व्हायचे. अशी पद्धत होती. परंतु मोदी यांच्या सरकारमध्ये भूमिपूजनही आमचेच सरकार करत आणि उद्घाटनही आमचेच सरकार करते, असा चिमटा त्यांनी काढला.मोठ्या कंपन्यांमधील अग्निशमन उपकरणांचाही उपयोग होणारअनेक मोठ्या कंपन्यांकडे अग्निशमनाशी संबंधित अत्याधुनिक उपकरण असतात. अशा उपकरणाची व सुविधांची नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मल्टिपर्पज उपयोगाच्या रणनीतीअंतर्गत हे करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती आल्यास जिल्हधिकाऱ्यांना या उपकरणाचा उपयोग करता येईल. यासाठी अत्याधनिक उपकरण मागवण्याची गरज भासणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्षअमित शाह यांनी सांगितले की, २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर होती. तेव्हा आम्ही जगात ११ व्या क्रमांकावर होतो. पाच वर्षात आम्ही ती २ ट्रिलियनपर्यंत पोहोचवली. म्हणजेच ७० वर्षात एक ट्रिलियन आणि पाच वर्षात एक ट्रिलीयन अशा पद्धतीने आम्ही काम केले. पुढील पाच वर्षात ५ ट्रिलियन डॉलरवर अर्थव्यवस्था नेऊन जगात ती १ ते ३ क्रमांकापर्यंत पोहोचवण्याचे आमचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले.

 राष्ट्रपती अग्निशमन शौर्य पदकांचे वितरण यावेळी अग्निशमन सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना राष्ट्रपती अग्निशमन शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. अब्दुल माजिद वाणी, रवींद्र कुमार, राज कुमार, मनोहर लाल, पूरण सिंह, राजन, मनप्रीत सिंह, सुखदेव सिंह यांना मरणोपरांत पुरस्कार मिळाला. त्यांच्या नातेवाईकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच हजुरा सिंह, नरेश कुमार, लवलेश सूद, सुदागर सिंह, गुलाम हसन वाणी, बशीर अहमद खान, गुलाम हसन भट्ट, गुलाम हसन लोन, परवेज अहमद वानी, अमन शर्मा, अजित सिंह, जितेंद्र कुमार, धर्मेंद्र मिश्रा, लोटन राम, सूर्यप्रताप सिंह, राकेश तिवारी, प्रमोद भोंडे, इंद्रजीत सिंह चड्ढा व उमापती दंडापती यांनाही शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :National Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलAmit Shahअमित शहा