शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

जबरानजोतधारकांची जगण्याची लढाई

By admin | Published: October 31, 2015 3:30 AM

जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत.

जमीन अधिकार परिषद : विजय पंड्या यांचे प्रतिपादननागपूर : जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत. परंतु आज सरकारकडून त्या जमिनींना धोका निर्माण झाला आहे. त्या सर्व जमिनी परत घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. हा केवळ जमिनीचा संघर्ष नसून जगण्याची लढाई असल्याचे प्रतिपादन विजय पांड्या यांनी केले. कष्टकरी जन आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी जबरानजोतधारकांची जमीन अधिकार परिषद आयोजित करण्यात आली होती. धरमपेठ येथील सर्वोदय आश्रम येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी आमदार वामनराव चटप, अरुण केदार, प्रवीण मोते, रेखा पवार, कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक विलास भोंगाडे, वसंतराव वाघमारे व दिनेश म्हरसकोल्हे उपस्थित होते. या परिषदेत विदर्भातील शेकडो जबरानजोतधारकांनी भाग घेतला होता. पांड्या पुढे म्हणाले, ही लढाई फार मोठी आहे. त्यामुळे धरणे, आंदोलन व मोर्चांसह आपल्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कायदेशीर हक्क कसा मिळविता येईल, याचाही विचार करावा, असे त्यांनी आवाहन केले. सरकार जबरानजोतधारकांच्याविरुद्ध असले, तरी प्रत्येक गावातील ग्रामसभा मात्र आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला कुणीही हटवू शकत नाही आणि उठवूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले. वामनराव चटप यांनी सरकारने जबरानजोतधारकांना मालकी पट्टे देण्यासोबतच त्यांना भूस्वामी सुद्धा बनविले पाहिजे, अशी मागणी केली. जबरानजोतधारक हा जमिनीचा मालक झाल्याशिवाय त्याला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. शिवाय कर्जही दिले जात नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरू वातीला विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेची संक्षिप्त माहिती दिली. संचालन एकनाथ गजभिये यांनी केले. समीक्षा गणवीर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)