शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री; ६५२ जणांकडून ३० लाख दंड वसूल

By नरेश डोंगरे | Updated: June 2, 2024 21:16 IST

महिनाभरात रेल्वेची कारवाई : मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरखपूर एक्स्प्रेसमधील बिर्याणी प्रकरण तापल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिनाभरात रेल्वेत खानपानाच्या चिजवस्तू विकणाऱ्यांना चांगलेच टाइट केले आहे. या पार्श्वभूमीवर, परवानगी नसताना विविध खाद्यपदार्थ तसेच पेय विकणाऱ्या ६५२ जणांना कारवाईचा दणका दिला आहे.

महिनाभरापूर्वी गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या ७० जणांना बल्लारशाह आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून घेतलेली बिर्याणी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणाचे पडसाद सर्वदूर उमटल्याने रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. विविध रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये अनधिकृत व्हेंडर्सचा सुळसुळाट झाल्याचे ध्यानात घेऊन वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी कडक भूमिका घेऊन रेल्वेगाड्या तसेच रेल्वे स्थानकांवर चालणाऱ्या सर्व गैरप्रकारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, १ मे पासून ठिकठिकाणी कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आली.

प्रवाशांच्या आरोग्यास पोषक आणि दर्जेदार खानपान सेवा देण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील पँट्री कार आणि कॅटरिंग स्टॉल्सची कसून तपासणी सुरू झाली. या कारवाईत दर्जाहीन अन् परवानगी नसणारे पदार्थ, पाणी तसेच ६५२ अनधिकृत विक्रेते आढळले. अनिमियतता बाळगणाऱ्या १४४ पॅन्ट्री कारच्या चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंडापोटी २७.४५ लाख रुपये वसूल करण्यात आले.

ठरवून दिलेल्या मानकांचे पालन न करणाऱ्या ८३ कॅटरिंग स्टॉल्सवाल्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेत नीर पाण्याच्या बाटलीशिवाय दुसऱ्या पाणी बॉटल्स विकण्यात मनाई असूनही दुसऱ्याच पाण्याच्या बाटल्या विकल्या जात असल्याचे तपासणीत उघड झाले. अशा २६८८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. लेबल (स्टिकर) शिवाय विकली जाणारी खाद्यपदार्थांची १२२ पाकिटेही जप्त करण्यात आली.प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध : मित्तल

प्रवाशांना सुखद प्रवासाची अनुभूती मिळावी. तसेच त्यांना दर्जेदार खाद्यपदार्थ, पेय आणि पिण्याचे पाणी माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध आहे. अनधिकृत विक्रेत्यांमुळे आरोग्यास अपायकारक पदार्थ विकले जाऊ नये आणि प्रवाशांना कसलाही त्रास होऊ नये, यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून ती यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी कळविले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेfood poisoningअन्नातून विषबाधा