शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
4
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
7
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
8
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
9
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
10
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
11
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
12
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
13
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
14
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
15
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
16
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
17
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
18
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
19
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
20
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ४ विभागातील निविदा प्रक्रियेत घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:09 IST

‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार राज्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या ४ विभागांमधील निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असून विशिष्ट कंपन्यांना फायदा पोहोचविण्यात आला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

ठळक मुद्देधनंजय मुंडे यांचा आरोप : राज्यात कायद्याचे नव्हे ‘काय द्यायचे’ सरकार

आॅनलाईन लोकमतनागपूर : ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार राज्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या ४ विभागांमधील निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असून विशिष्ट कंपन्यांना फायदा पोहोचविण्यात आला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान त्यांनी राज्यातील गुन्हेगारीचा मुद्दा मांडत ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.कॉंग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. या प्रस्तावावर बोलताना धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. माहिती व तंत्रज्ञान विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामविकास विभागाच्या निविदा प्रक्रियांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. माहिती व तंत्रज्ञान विभागाने विशिष्ट कंपनीला शिष्यवृत्ती आणि कर्जमाफीसंदर्भातील कामाचे कंत्राट मिळावे, यासाठी ८ वेळा शुद्धीपत्रक काढले. अ दर्जाच्या कंपन्या असताना ‘क’ दर्जाच्या कंपनीला काम मिळाले. तसेच पशुसंवर्धन विभागातील जनावरांसाठीच्या ‘लाळ खुरकत’ रोगावरील लस खरेदीत आणि ग्रामविकास विभागाच्या ‘सॅनिटरी नॅपकिन’च्या खरेदीच्या निविदा प्रक्रियेतदेखील घोळ झाला आहे.तसेच नॅचरल गॅसच्या ‘एसजीएसटी’मध्येदेखील ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. या निविदा प्रक्रिया रद्द कराव्यात व दोषी असतील मंत्र्यांचा राजिनामा घ्यावा , अशी मागणी त्यांनी केली.प्रसंगी सरकारशी दोन हात करुराज्यात सातत्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढीस लागले असून उपराजधानी तर ‘क्राईम कॅपिटल’ झाली आहे. सत्तारुढ पक्षाशी संबंधित लोकांकडून कायदा हातात घेण्याच्या घटना घडत आहेत. राज्यात कायद्याचे नव्हे तर ‘काय द्यायचे’ सरकारच आहे, या शब्दांत मुंडे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यात सातत्याने अपराधांची संख्या वाढते आहे. ‘एनसीआरबी’, पोलीस अहवाल यात गुन्ह्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक गुन्ह्यांच्या सर्वाधिक घटना घडलेल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राचे स्थान असणं ही दुर्दैवी बाब आहे. राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर आता गुन्ह्यांची राजधानी होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ झालेले गुन्हे शहराची कायदा-सुव्यवस्था किती ढासळली आहे याचे उदाहरण आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रस्त्यावर उतरून सरकारशी दोन हात करावे लागले तरी आम्ही तयार आहोत, असे मुंडे म्हणाले. या प्रस्तावावर प्रवीण दरेकर, हेमंत टकले, हुस्नबानो खलिफे, डॉ.नीलम गोऱ्हे  यांनीदेखील मत मांडले.‘सोशल मीडिया’पेक्षा ‘क्राईम’कडे लक्ष द्या‘सोशल मीडिया’वरही सरकारचा ‘वॉच’ आहे. मंत्री किंवा सरकारच्या विरोधात आरोप केले तर थेट तुरुंगाची हवा खावी लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘सोशल मिडीया’पेक्षा राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकडे जास्त लक्ष द्यावे.पावडर खाऊन बनवलेली ‘बॉडी’ आणि मोदी लाटेत निवडून आलेले आमदार जास्त दिवस टिकत नाही, असा चिमटा मुंडे यांनी काढला.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Dhananjay Mundeधनंजय मुंडे