शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

शेतकऱ्यांच्या घरापर्यंत बियाणे-खते पोहचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 6:42 PM

सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या तयारीत शेतकरी लागले आहे. पण कोरोनामुळे भीतीचे सावट ग्रामीण भागात पसरले आहे. लॉकडाऊनमुळे वाहतुकीची साधने बंद आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके खरेदीसाठी शहरात, तालुक्यात जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, कृषी विभागाने अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकयांच्या घरापर्यंत बियाणे, खते पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी शेतकरी गटाचे साहाय्य घेतले आहे.कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था ‘आत्मा’अंतर्गत मोठ्या प्रमाणात शेतकरी गटांची नोंदणी करण्यात आली आहे. हे शेतकरी गट सध्या कृषी विभागाला तसेच प्रशासनाला साहाय्य करीत आहे. कोरोनाची भीती शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण जनतेने गावाचे रस्तेसुद्धा बंद केले आहेत. बाहेरून कुणी गावात येऊ नये आणि गावातील कुणी बाहेर जाऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सध्या खरीप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीचे काम सुरू केले आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी काही शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. पण त्यासाठी शहरात अथवा तालुक्यात जाऊन कृषी केंद्रातून ही खरेदी करायची आहे. दरम्यान, शेती साहित्य खरेदी करताना गर्दी होऊ नये, असा प्रयत्न कृषी विभागाने केला आहे. शेतकरी गट तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकरी बांधवांना त्यांच्या बांधावर कृषी निविष्ठा पुरवठा करण्याकरिता नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी जिल्ह्यात एकूण २०१ गटांनी नोंदणी केलेली आहे. या गटांकडे शेतकऱ्यांनी लागणारे बियाणे, खते, कीटकनाशकांची मागणी नोंदवायची आहे. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन आवश्यक आणि योग्य दरामध्ये कृषी साहित्य खरेदी करण्यात येत आहे. गटाने खरेदी केलेले साहित्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहचवून देण्यात येत आहे.त्यापैकी १७७ शेतकरी गटांकडे ३,१४२ शेतकऱ्यांनी ७००४ मेट्रिक टन खतपुरवठा करण्याकरिता मागणी नोंदवलेली आहे. आतापर्यंत २५ शेतकरी गटांनी ४०४ शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार ३९९ मेट्रिक टन खतांचा पुरवठा केला आहे.गटाकडे मागणी नोंदणी केल्यानंतर आम्ही कृषी केंद्राशी चर्चा घडवून आणतो. गटामार्फत कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदी केली जाते. यामुळे गर्दी टाळता येते. वेळेत आणि पाहिजे तो माल मिळतो. शिवाय वाहतुकीचा खर्च कमी येतो.संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी