शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून महिला मनोरुग्ण पळाल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 20:13 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमी उंचीच्या संरक्षण भिंतीमुळे दरवर्षी आठ ते दहा रुग्ण पळून जायचे. यावर आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून भिंतीची उंची वाढविण्यात आली. ३२ लाख रुपये खर्चून ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतरही रुग्णालयातून मनोरुग्णांचे पळणे सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा एक ३६ वर्षीय महिला रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. गेल्या तीन वर्षांत हे रुग्णालय मनोरुणाची हत्या, अत्याचार, मृत्यू आणि पळण्याच्या घटनेने चांगलेच चर्चेत राहिले आहे.

ठळक मुद्देदरवर्षी ८ ते १० रुग्ण काढतात पळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कमी उंचीच्या संरक्षण भिंतीमुळे दरवर्षी आठ ते दहा रुग्ण पळून जायचे. यावर आवर घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करून भिंतीची उंची वाढविण्यात आली. ३२ लाख रुपये खर्चून ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यानंतरही रुग्णालयातून मनोरुग्णांचे पळणे सुरूच आहे. शुक्रवारी पुन्हा एक ३६ वर्षीय महिला रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली. गेल्या तीन वर्षांत हे रुग्णालय मनोरुणाची हत्या, अत्याचार, मृत्यू आणि पळण्याच्या घटनेने चांगलेच चर्चेत राहिले आहे.नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून रुग्ण पळून जातात, याकडे आ. तारासिंग यांनी हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर संरक्षण भिंतीची उंची वाढविण्यासाठी एक कोटी आठ लाखांचा निधी देण्यात आला. यामुळे सहा-सात फूट उंचीची भिंत बारा फुटाच्याही वर गेली. सामान्य व्यक्तीलाही ही भिंत ओलांडणे अवघड झाले. असे असताना, जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत पाचवर रुग्ण पळून गेले. विशेष म्हणजे, यातील चार रुग्ण हे मुख्य प्रवेशद्वारातून पळून गेले. गेल्या महिन्यात दोन रुग्ण तर चक्क रुग्णालयाच्या स्वयंपाकीची दुचाकी चोरून पळून गेले. त्यानंतर या महिन्यात पुन्हा एक ४० वर्षीय मनोरुग्ण पळून गेला. हा रुग्ण दिल्ली येथील एका बड्या घरातील असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, रुग्ण पळून जाणाऱ्या घटनांवर प्रतिबंध बसण्यासाठी व रुग्णांच्या सुरक्षेला घेऊन नुकतेच ३२ लाख रुपये खर्चून रुग्णालयाच्या आत व परिसरात ५८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे रुग्ण पळून जाण्याच्या घटनांवरून दिसून येते.प्राप्त माहितीनुसार, पळून गेलेली ३६ वर्षीय महिला मनोरुग्णाला दोन महिन्यांपूर्वी प्रादेशिक मनोरुग्णालयात पोलिसांकडून भरती करण्यात आले. परंतु तिला स्वत:ची माहिती नसल्याने अनोळखी रुग्ण म्हणून तिची नोंद करण्यात आली. रुग्णालयाने तिचे नाव रिता ठेवले होते. वॉर्ड क्र. १७ मध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान ती पळून गेली. वॉर्डाच्या मागील कमी उंचीच्या भिंतीवरून ती पळून गेली असावी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.रुग्ण पळून जाण्याच्या घटना थांबणार कधी?प्रादेशिक मनोरुग्णालयातून रुग्ण पळून जातात, चौकशी समिती बसविली जाते आणि सुरक्षा रक्षकाला जबाबदार धरून त्याला निलंबित केले जाते. त्यानंतर ते प्रकरण बंद पडते. पुन्हा कुणी पळून गेल्यावर हेच चक्र फिरते. परंतु रुग्ण पळून का जातो, या मागील कारण जाणून घेण्यास कुणीच इच्छुक नसल्याचे चित्र आहे. पावसाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने आरोग्य विभागाचे मंत्र्यांपासून ते आयुक्त, सचिव व संचालक नागपुरात आहेत, त्यांनी हा विषय गंभीरतेने घेतल्यास तो कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर