शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
6
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
7
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
8
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
9
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
10
एका महिन्यात 30 लाख नवीन ग्राहक! BSNL ची कमाल;  Airtel, Vodafone आणि Jio ची  अवस्था वाईट!
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

डेंग्युच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे; लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या

By सुमेध वाघमार | Published: August 17, 2023 6:04 PM

४०-६० टक्के रुग्णांचे घटतात प्लेटलेट्स

नागपूर : मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढत्या डेंग्यू रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. विशेषत: तीन ते चार दिवसांत डेंग्यूचा ताप कमी होताच रुग्णाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने प्लेटलेट्स कमी होऊन जीवाचा धोका वाढत आहे. डेंग्यूच्या रुग्णांसाठी सात ते चौदा दिवस महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

पावसाळ्यात डेंग्यु, मलेरीयासारख्या आजारांसह जिवाणूजन्य, बुरशीजन्य व व्हायरल संसगार्मुळे प्लेटलेट्स कमी होऊ शकतात.  डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण कमी झाल्याने रक्त गोठण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यामुळे जीवाचा धोकाही संभवतो. अशा वेळी साध्या तापाकडेही दुर्लक्ष करू नये, असे डॉ. रिया बालीकर यांचे म्हणणे आहे.

- सातव्या दिवसांपासून प्लेटलेट्स होतात कमी

डेंग्यू झाल्यानंतर रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण घटत असले तरी ताप आल्यानंतर तातडीने प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत नाही. साधारणत: सातव्या दिवशीपासून प्लेटलेट्स कमी होतात, असे निरिक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. त्यावेळी ताप कमी झाल्याने रुग्णाचे प्लेटलेट्सच्या संख्येकडे दुर्लक्ष होऊ शकते. एकूणच डेंग्यु विकारामध्ये सात ते चौदा दिवस हे फार महत्त्वाचे असतात. चौदाव्या दिवसानंतर पुन्हा प्लेटलेट्सचे प्रमाण वाढू लागते.

- ५ ते १० टक्के रुग्णांमध्येच धोकादायक पद्धतीने प्लेटलेट्मध्ये घट

डेंग्यू रुग्णांमध्ये प्लेटलेट्स कमी होणे ही सामान्य बाब आहे. ४० ते ६० टक्के रुग्णांच्या शरिरातील प्लेटलेट्स कमी होतात. पण, केवळ ५ ते १० टक्के रुग्णांमध्येच प्लेटलेट्स धोकादायक पद्धतीने घट होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे डेंग्यू होताच फार अधिक चिंता करण्याची गरज नाही. पण, तापाकडे दुर्लक्ष नको, काळजी निश्चितच घ्यावी, डॉक्यरांचा सल्ला व योग्य औषधोपचार घ्यावा.

- प्लेटलेट्स २० हजारांच्या खाली आल्यास धोका

 प्लेटलेट्स रक्तातील सर्वात छोट्या पेशी असतात. रक्तातील ‘क्लॉटिंग’ घटकांसह रक्तस्त्राव थांबविणे हे प्लेटलेट्सचे मुख्य कार्य आहे. रक्तात प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास रक्त स्त्राव होण्याचा धोका वाढतो. शरीरात १.५ लाख ते ४.५ लाख प्लेटलेट्स प्रति ‘मायक्रोलिटर’ असतात. मात्र, त्यांची संख्या २० हजारांच्या खालती आली तर धोक्याची पातळी ओलांडल्याचे मानले जाते. अशा वेळी रुग्णाला बाहेरून प्लेटलेट्स देण्याची गरज पडू शकते. याशिवाय  डेंग्यूसोबतच इतरही आजार उद्भवतात. यकृत, फुफ्फूस, मेंदू आणि किडनीवरही परिणाम होतो. ही स्थिती निर्माण झाल्यास रुग्णास भरती करणे गरजेचे असते. मात्र, वेळेत उपचार केले तर गुंतागूंत टाळता येऊ शकते. 

- पपईचा पानाचा रसामुळे प्लेटलेट्स वाढत नाही

डेंग्यु झाल्यानंतर पपईच्या पानांचा रस व पपई देण्यात येते. शिवाय किवीसारखी काही फळ देखील दिल्या जातात. मात्र, त्यामुळे प्लेटलेट्स वाढत असल्याचे आढळून आले नाही. शिवाय याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. उलट कुणाला प्लेटलेट्सची गरज असल्यात ते दान करण्यावर भर द्यावा. 

- डॉ. रिया बालीकर, रक्तविकार तज्ज्ञ

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू