शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

बेळगाव वादावर शंभूराज देसाईंचा कर्नाटकवर हल्लाबोल; मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:32 IST

देसाई यांनी कर्नाटकवर अरेरावी आणि दादागिरीचा आरोप केला आणि सांगितले की, कर्नाटक सरकारने सतत वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांच्या अधिकारांना डावलले आहे.  

नागपूर: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी  मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव सीमा वादावरून कर्नाटक सरकारवर कडाडून हल्ला चढवला. पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी कर्नाटकवर अरेरावी आणि दादागिरीचा आरोप केला आणि सांगितले की, कर्नाटक सरकारने सतत वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांच्या अधिकारांना डावलले आहे.  

देसाई यांनी सांगितले की, मागील सरकारच्या कार्यकाळात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना, या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी समन्वय मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला बेळगावला भेट देण्यास मज्जाव करून हे प्रयत्न हाणून पाडले. "कर्नाटक सरकारची ही उघड दादागिरी आहे, जी अनेक वर्षांपासून चालू आहे," असे देसाई म्हणाले.  

देसाई यांनी ८६५ गावांमधील मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्राच्या ठाम पाठिंब्याची ग्वाही दिली. "या गावांतील लोकांनी महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण कर्नाटक सरकार त्यांच्या अनुचित कृती सुरूच ठेवत आहे," असे देसाई म्हणाले. तसेच, हा सीमा वाद न्यायप्रविष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती, हे त्यांनी सांगितले.

बेळगाव वाद हा महाराष्ट्र-कर्नाटक संबंधांमधील एक मोठा वादग्रस्त मुद्दा राहिला आहे, आणि देसाई यांच्या विधानांनी या विषयाचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करनार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.  देसाई यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अधिवेशनात बेळगाव वाद एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे.

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईbelgaonबेळगाव