शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

भाजप हिंदुत्वाच मार्केटिंग करतयं.. 'बंटी-बबली' त्या नौटंकीमधलं पात्र, संजय राऊतांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 1:02 PM

बंटी-बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ दे, त्यांना मुंबईच पाणी माहिती नाहिये अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ठळक मुद्देहनुमान चालिसा वाचणं हा श्रद्धेचा विषय, नौटंकी किंवा स्टंटबाजी नव्हे

नागपूर : राणा दाम्पत्याने मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यांनी याबाबतची तारीखही जाहीर केली होती. त्यानंतर आज ते मुंबईत दाखल झाले आहेत. तर, त्यांच्या आव्हानानंतर शिवसैनिकांचीही मातोश्रीबाहेर मोठी गर्दी जमली आहे. बंटी-बबलीला मुंबईच पाणी माहिती नसल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हनुमान चालिसा वाचन आणि रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे व धार्मिक विषय आहेत, नौटंकी किंवा स्टंटबाजीचे विषय नाहीत.परंतु, भाजपने हिंदुत्वाची नौटंकी आणि स्टंटबाजी करून ठेवली असून त्यातीलच हे सर्व पात्र असल्याची सणसणीत टीका राऊत यांनी केली.

बंटी आणि बबली मुंबईत पोहोचले असतील तर येऊ दे, आम्हाला फरक पडत नाही. ही सर्व स्टंटबाजी आहे. हे सगळे फिल्मी लोकं आहेत. स्टंटबाजी व मार्केटिंग करणं त्यांच काम असून भाजपाला आता मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज पडत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व म्हणजे काय हे आम्हाला माहित आहे, असं राऊत म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाShiv Senaशिवसेना