शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

 शिवसेनेचा धनगर आरक्षणाला कायमच पाठिंबा, अहिल्याबाईंच्या कामाची मिळते पदोपदी साक्ष - नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 17:46 IST

राज्यातील धनगर  समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्षराचा फरक असून तो काढून टाकल्यास अनेक समाजघटकांना न्याय मिळू शकेल.

नागपूर : राज्यातील धनगर  समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्षराचा फरक असून तो काढून टाकल्यास अनेक समाजघटकांना न्याय मिळू शकेल. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी तर आर्थिक आरक्षण असावे असे सांगितले होते. आताही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठींबा देऊ केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधान परिषदेत केले. परिषदेच्या सभागृहात नियम ९७ अन्वये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आ. रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, “अहिल्या देवी होळकर, मल्हारराव होळकर यांनी मराठी साम्राज्याचा केलेला विस्तार व समाज हिताच्या दृष्टीने केलेल्या अनेक योजना आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यामुळेच ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही थोर व्यक्तिमत्वे आज सर्व समाजाला आपली वाटतात. मंडल आयोगाने सादर केलेल्या अहवालानंतर देशात आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. या समाजाने त्यांच्या आरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आहेत.  आरक्षण मिळावे या मुद्द्यावरून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. १९५० ते २०१७ या ६७ वर्षातील ५५ वर्षे कॉंग्रेसचे राज्य या देशावर होते. परंतु या भोळ्या समाजाला कोणत्याही सुविधा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मधल्या काळात जनता दलाच्या व्ही पी सिंगांच्या सरकारलाही या विषयी निर्णय घ्यावासा वाटला नाही. राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. धनगर समाजाच्या विकासाची मागणी केलेल्या महाराष्ट्राचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या कार्याची आज आठवण होते आहे. त्यांची कमतरता आजही सर्वांनाच भासत आहे. या आंदोलनाला यश मिळावे या करिता शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल.

धनगर ही या देशातील आती प्राचीन स्वतंत्र अस्तित्व असणारी विचार व आचार धारा आहे .धनगर ही संपूर्ण देशभर आढळणारी बहुभाषिक जमात आहे. आदिवासी वा इतर जातींच्या हिताला धक्का न लावता या समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे.”

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे