शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सौर ऊर्जेला झटका; आता ५० मेगावॅटसाठीच सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2021 17:58 IST

राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा अजब निर्णय : शुद्धीपत्रक जारीराज्यात नागरिकांचे १७५ कोटींच्या सबसिडीचे नुकसान

कमल शर्मा

नागपूर : कोळशाचा तुटवडा आणि औष्णिक वीज केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे जगात गैर पारंपरिक ऊर्जा वाढविण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. पण, महाराष्ट्रात गंगा उलटी वाहत असल्याचे चित्र आहे.

राज्य सरकारची कंपनी महावितरणने सोलर रुफ टॉपवरून केवळ ५० मेगावॅट क्षमता विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. तर, दुसरीकडे केंद्र सरकारने त्याकरिता ५०० मेगावॅटला हिरवा झेंडा दिला आहे. कंपनीच्या या अजब निर्णयामुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे १७५ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

सोलर रूफ टॉप लावण्यासाठी केंद्र सरकार ४० टक्क्यांपर्यंत सबसिडी देते, हे उल्लेखनीय. सन २०१९ मध्ये २५ मेगावॅट क्षमतेपर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय झाला. पण, केवळ ०.२५ टक्के सबसिडीचा फायदा नागरिकांना मिळत आहे. केंद्र सरकारची एजन्सी एमएनआरईने यानंतरही महाराष्ट्राला ५०० मेगावॅटची ऑफर दिली, पण महावितरणने ३०० मेगावॅट सोडून दिले. केवळ २०० मेगावॅटचे सोलर रूफ टॉप लावण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नागरिकांना ३५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. कंपनीने या संदर्भात निविदासुद्धा मागविली, पण एका आठवड्यातच कंपनीने सोमवारी रात्री शुद्धीपत्रक जारी केले. यानुसार कंपनी २०० मेगावॅट नव्हे तर केवळ ५० मेगावॅटकरिताच सबसिडी देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील नागरिकांचे सबसिडीचे १७५ कोटी रुपयांचे नुकसान आणखी वाढले आहे.

आगाऊ रक्कम मिळणार नाही

मागील लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर योजनेला क्रियान्वित करण्यासाठी राज्याला ३० टक्के रक्कम आगाऊ मिळेल, असे एमएनआरईने ३ सप्टेंबर २०१९ ला आदेश जारी करून स्पष्ट केले होते. पण, महाराष्ट्राने मागील लक्ष्य पूर्ण केलेले नाही. या कारणामुळे राज्याला कोणतीही आगाऊ रक्कम देण्यात येणार नाही.

टॅग्स :Governmentसरकारelectricityवीज