शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

धक्कादायक वास्तव : लैंगिक शोषण, अत्याचाराला बळी पडून अल्पवयीन मुली झाल्या माता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:13 IST

डॉ. अविनाश गावंडे यांचा अभ्यास : १२४ कुमारी मातांमध्ये ६७ अल्पवयीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लैंगिक शोषण व अत्याचाराला बळी पडलेल्या अल्पवयीन मातांची संख्या वाढताना दिसून येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (आयजीएमसी) जानेवारी २०२३ ते जून २०२४ या कालावधीत १२४ कुमारी मातांची नोंद झाली. यात तब्बल ६७ माता या अल्पवयीन होत्या. 'आयजीएमसी'चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. पी. बी. राऊत व डॉ. उदय नारलावर यांच्या अभ्यासातून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे.

जम्मू-काश्मीर येथील श्रीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या 'आयएपीएसएमकॉन' या राष्ट्रीय परिषदेत डॉ. गावंडे यांनी हा अभ्यास मांडला. 'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले, भारतासह संपूर्ण जगात विवाहबाह्य गर्भधारणेचे प्रमाण वेगाने वाढत आहे. यात अल्पवयीन मुली गर्भवती होण्याची संख्या चिंताजनक आहे. अल्पवयात मातृत्व धारण करणे ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे, जी केवळ मुलीच्या आरोग्यावर आणि भविष्यावरच नव्हे तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही दूरगामी परिणाम करते.

१८ ते २१ वयोगटात २४ टक्के कुमारी माताजानेवारी २०२३ ते जून २०२४ या कालावधीत १२४ मातांमध्ये १८ वर्षांखालील मुलींचे प्रमाण ५४ टक्के असताना १८ ते २१ वयोगटात कुमारी मातांचे प्रमाण २४ टक्के होते. २२ ते २५ वयोगटात १७ टक्के, तर २१ ते २५ वयोगटात ५ टक्के प्रमाण होते.

५४% बाळ कमी वजनांचीअल्पवयात गर्भधारणा आणि बाळंतपण हे मुलीच्या शारीरिक आणि मानसिक मुलाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे कुपोषण, रक्तस्त्राव, उच्च रक्तदाब आणि प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण होऊ शकते. कमी वजनाची बाळ जन्माला येऊन जिवालाही धोका होऊ शकतो. प्रसूती झालेल्या ७५ प्रकरणांपैकी ५४ टक्के बाळ कमी वजनाची होती. यातील १२ टक्के बाळांचा मृत्यू झाला.

४८ टक्के कुमारी मातांनी दिला बाळाला जन्मनोंद झालेल्या कुमारी मातांपैकी ४८ टक्के कुमारी मातांनी बाळाला जन्म दिला, तर ३३ टक्के कुमारी मातांनी गर्भपाताचा निर्णय घेतला. २४ आठवड्यांखालील गर्भवती महिलांनी अधिक प्रमाणात गर्भपाताचा पर्याय निवडला, तर २४ आठवड्यांनंतरच्या प्रकरणांमध्ये प्रसूतीचे प्रमाण अधिक होते. 

विशेष पुनर्वसन योजना हवीडॉ. गावंडे यांनी सांगितले, बळी पडलेल्या अल्पवयीन मातांना कायदेशीर मदत आणि संरक्षण पुरवणे आवश्यक आहे. कठोर कायदे, सामाजिक जागरूकता आणि योग्य आरोग्य सेवांच्या माध्यमातून या समस्येवर नियंत्रण शक्य आहे. कुमारी मातांसाठी विशेष पुनर्वसन योजना हवी.

टॅग्स :nagpurनागपूर