शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धक्कादायक ! नागपूर जिल्ह्यातील सुराबर्डी तलावात मिसळतेय शौचालयातील पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 19:28 IST

Nagpur News नागपूरजवळ असलेल्या सुराबर्डी तलावात संडास व मूत्रीघरातले पाणी मिसळत असल्याची बाब समोर आली असून, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयात याचिकातलावातील पाण्याचा नागरिकांना पुरवठा

नागपूर : तब्बल ७५.३९ हेक्टर परिसरात पसरलेल्या आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवीत असलेल्या सुराबर्डी तलावामध्ये शौचालय व मूत्रीघरातील पाणी मिसळत आहे. याशिवाय जनावरांच्या गोठ्यांतील घाण व स्मशानभूमीतील राखही तलावात फेकली जात आहे. परिणामी, हा तलाव प्रदूषित झाला आहे.

शेतकरी नितीन शेंद्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, निष्काळजी व उदासीनता यांमुळे हा भव्य व आकर्षक तलाव कायमचा निरुपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. लावा-सुराबर्डी पाणीपुरवठा योजनेंतर्गत परिसरातील अनेक गावांना या तलावाचे पाणी पुरविले जाते. असे असतानाही तलाव संपवला जात आहे.

सुराबर्डी गावातील सांडपाणी तलावात सोडले जात आहे. त्यासोबत संडास व मूत्रीघरातील घाण तलावात मिसळत आहे. तलावाजवळ जनावरांचे गोठे आहेत. तेथील घाणदेखील तलावात टाकली जात आहे. याशिवाय गावातून तलावाकडे जाणाऱ्या ६० मीटर रुंदीच्या पांधन रोडवर अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत. त्यामुळे केवळ १० फूट रुंदीचा रस्ता मोकळा राहिला आहे. परिणामी, या रस्त्यावर अपघात वाढले आहेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

राज्य सरकारला नोटिस

या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने याचिकेतील आरोप गंभीरतेने घेऊन राज्य सरकार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदींना नोटीस बजावली व यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सुधीर मालोदे तर, सरकारतर्फे ॲड. केतकी जोशी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण