शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

त्या दुर्दैवी मृतकांना 'शरदवासी ‘ म्हणायचे का? भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2023 7:00 AM

Nagpur News शरद पवारांनी राजकारणाची खालची पातळी गाठली असून त्यांच्या कार्यकाळात मृत झालेल्यांना 'शरदवासी' असे म्हणायचे का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी शनिवारी रात्री ट्वीट केले.

योगेश पांडे नागपूर : समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघातावरून राज्यात राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'देवेंद्रवासी' या वक्तव्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शरद पवारांनी राजकारणाची खालची पातळी गाठली असून त्यांच्या कार्यकाळात मृत झालेल्यांना 'शरदवासी' असे म्हणायचे का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात त्यांनी शनिवारी रात्री ट्वीट केले.

समृद्धी महामार्गावरील अपघात अतिशय दुर्दैवी घटना आहे. संपूर्ण महाराष्ट्र शोक करतो आहे. हा अपघात आहे. समृद्धी महामार्गाला सर्वोत्तम महामार्ग करण्यासाठी देवेंद्र फडणवीस जीवाचे रान केले. लाखो प्रवासी या मार्गाचा उपयोग करत आहेत. देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना घडल्या. अपघात कधीही घडू शकतो. मात्र फडणवीस यांचा व्यक्तिगत विरोध करताना पवार यांनी खालची पातळी गाठली. पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झालेल्या प्राणघातक घटना ते सोयीस्कर विसरले. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला, गोवारींची चेंगराचेंगरी , मावळचा गोळीबार या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात झाल्या होत्या.या सगळ्या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर कायमचे ओरखडे उमटले व अजूनही जखमा ओल्या आहेत. मग या घटनांत मृत्यूमुखी पडलेले सगळेच "शरदवासी" म्हणायचे का असा सवाल बावनकुळे यांनी केला.

टॅग्स :Accidentअपघात