शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
2
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
3
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
4
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
5
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
6
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
7
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
8
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
9
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
10
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
11
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
12
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
13
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
15
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
16
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
17
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
18
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
19
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
20
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश

नागपूर ग्रामीण भागात सहा नवीन पोलीस ठाणे, गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे टार्गेट

By योगेश पांडे | Updated: April 9, 2025 18:41 IST

Nagpur : पोलीस ठाण्यांची संख्या होणार ३१

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहे. सरकारने सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांची पायपीट वाचणार असून अनेक रेतीमाफिया तसेच तस्करांवरदेखील चाप लावण्यास मदत मिळणार आहे.

यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. यासंदर्भातील बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल हेदेखील उपस्थित होते. नागपूर ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ सहकार्य मिळण्यासाठी पोलिस ठाण्यांची गरज होती. त्यादृष्टीने सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार आता नागपूर जिल्ह्यात वडोदा, बाजारगांव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होलीबारा या सहा ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या नवीन पोलिस ठाण्यांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना राबवता येणार आहेत. आम्ही या प्रकल्पाला प्राधान्य देत आहोत आणि या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. आमचे लक्ष्य हे पोलिस ठाणे लवकरात लवकर कार्यरत करणे आहे, जेणेकरून स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यांची संख्या होणार ३१नागपूर ग्रामीण भागात नागपूर सायबर पोलीस ठाणे मिळून एकूण २५ पोलीस ठाणे आहेत. आता सहा नवीन पोलीस ठाण्यांमुळे जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाण्यांची संख्या ३१ इतकी होईल. नवीन पोलिस ठाण्यांमुळे गावांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :nagpurनागपूरPolice Stationपोलीस ठाणे