शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

वीज कर्मचाऱ्यांच्या घरी लागले स्मार्ट प्रीपेड मीटर  

By आनंद डेकाटे | Published: May 22, 2024 9:08 PM

आता सर्वसामान्य ग्राहकांच्या घरी लागणार.

नागपूर : नवीन तंत्रज्ञानाने बचतीचा दावा करत महावितरणने नागपूर परिमंडळांतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये प्रथम मीटर बसविण्यात आले आहेत. आता काही दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांच्या घरी जुन्या मीटरच्या जागी हे मीटर बसवण्यास सुरुवात होणार आहे.

 महावितरणने कमी दाबाच्या प्रत्येक श्रेणीतील २ कोटी ४२ लाख ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यापासून केवळ कृषी पंप ग्राहकांना दूर ठेवण्यात आले आहे. वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील स्मार्ट मीटर, गेटवे आणि डेटा सेंटरमध्ये माहितीच्या देवाणघेवाणीची चाचणी घेतल्यानंतर मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे स्मार्ट मीटर आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केल्याचा दावा महावितरणने केला आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीज खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. मीटर मोफत बसवले जात आहेत. खराब झाल्यास, ते विनामूल्य बदलले जातील. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेतलेला हाच निर्णय लागू राहील. मात्र या माध्यमातून ग्राहकांना विजेवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत हैप्पी अवर्सग्राहक मोबाइलप्रमाणेच स्मार्ट प्रीपेड मीटरचे ऑनलाइन रिचार्ज करू शकतील. त्यांना दररोज किती वीज वापरली गेली आणि किती उपलब्ध आहे याची माहिती दिली जाईल. संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत आनंदाचे तास (हैप्पी अवर्स) असतील. या कालावधीत रक्कम संपली तरी पुरवठा खंडित होणार नाही. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही रिचार्ज संपला तरी वीज कापली जाणार नाही. ग्राहक ऑनलाइन तसेच ऑफलाइन रिचार्ज करू शकतील.

 काय-काय बंद होईलस्मार्ट मीटर बसवल्यानंतर मीटर रीडिंग, वीजबिल तयार करणे, वितरण करणे बंद होईल. मोबाईलप्रमाणेच वीज रिचार्ज करून आवश्यकतेनुसार वापरावी लागणार आहे. मानवी हस्तक्षेपामुळे चुकीचे रीडिंग किंवा सरासरी बिले येणे बंद होईल. स्मार्ट मीटरचे मासिक बिल वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध असेल. गरज भासल्यास ग्राहक त्याची प्रिंट काढू शकेल.

टॅग्स :nagpurनागपूर