शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

...तर भाजप कार्यकर्ते संयम सोडतील, उद्धव ठाकरेंनी राजकारणाची मर्यादा पाळावी; बावनकुळे यांचा इशारा

By योगेश पांडे | Updated: September 12, 2023 01:30 IST

"उद्धव ठाकरे यांची भाषा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणारी आहे. त्यांनी राजकारणाची मर्यादा पाळावी."

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी परत एकदा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची भाषा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविणारी आहे. त्यांनी राजकारणाची मर्यादा पाळावी. ते ज्या पद्धतीने भाजप नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत ते पाहता भाजप कार्यकर्ते कधी संयम सोडतील हे सांगता येत नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला आहे. सोमवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कुणबी-मराठा हे भावासारखे राहतात. त्यामुळे दोन भावांत वाद निर्माण करणे चुकीचे आहे. याबाबतीत सरकार योग्य तो निर्णय घेईल. राज्यात शांतता रहावी हाच आमचा प्रयत्न आहे. मात्र उद्धव ठाकरे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केवळ आरोप करायचे आहेत. जनतेत संभ्रम निर्माण करणे हेच त्यांचे काम आहे, असा आरोप बावनकुळे यांनी लावला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या विदेशदौऱ्यांबाबतदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी दर महिन्याला विदेशात का जातात, हा संशोधनाचा विषय आहे. पुढच्या वेळी विदेश दौऱ्यावर जातील, तेव्हा त्यांनी त्यांच्या विदेश दौऱ्याविषयी १४० कोटी भारतीयांना माहिती द्यावी, असेही बावनकुळे म्हणाले. 

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे