शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

- तर यंदा जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 1:16 AM

आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरूआहे. परंतु अजूनही अपवाद वगळता जलाशयांची स्थिती चांगली नाही.

ठळक मुद्देगोसेखुर्द भरले, तोतलाडोहमध्ये अत्यल्प साठा : मोठ्या प्रकल्पात २८ टक्के, मध्यम प्रकल्पात केवळ ३३ टक्के साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरूआहे. परंतु अजूनही अपवाद वगळता जलाशयांची स्थिती चांगली नाही. गोसेखुर्द प्रकल्प १०० टक्के भरला. परंतु तोतलाडोहमध्ये अजूनही अत्यल्प साठा आहे. त्यात केवळ ११ टक्के साठा आहे. उर्वरित प्रकल्पांचीही अशीच अवस्था असून बहुतांश जलाशये अजूनही कोरडी आहेत. एकूण प्रकल्पांचा विचार केला तर आजच्या घडीला मोठ्या प्रकल्पात केवळ २८ टक्के तर मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३३ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण पाणीसाठ्याची क्षमता ही २९६४.४ दलघमी इतकी आहे.जलसंपदा विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २६ आॅगस्ट रोजी या मोठ्या प्रकल्पांमध्ये आतापर्यंत एकूण ८१६ दलघमी इतका म्हणजे केवळ २८ टक्के पाणीसाठा आहे. या १८ पैकी केवळ कामठी खैरी (५२ टक्के), लोवर नांद (८५ टक्के), वडगाव (७६ टक्के), दिना (५२ टक्के), पोथरा ५१ टक्के, आणि गोसेखुर्द १०० टक्के भरले आहेत. उर्वरित १२ प्रकल्पांना अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे.तोतलाडोह प्रकल्पात केवळ ११ टक्के, रामटेक २१ टक्के, इटियाडोह २९ टक्के, सिरपूर ४ टक्के, पुजारीटोला ३ टक्के, कालिसरार ६ टक्के, असोलामेंढा ३३ टक्के, बोर ३० टक्के, धाम ४६ टक्के, लोवर वर्धा टप्पा-१ (२७ टक्के)आणि धापेवाडा बॅरेज टप्पा १ (३२ टक्के) इतका पाणीसाठा आहे.मध्यम प्रकल्पांची स्थितीही भयावह आहे. नागपूर विभागात एकूण ४० मध्यम प्रकल्प आहेत. याची एकूण पाणीसाठ्याची क्षमता ही ५३७.५८ दलघमी इतकी आहे. आजच्या तारखेत (२६ आॅगस्ट) केवळ १७६.४८ दलघमी म्हणजेच ३३ टक्के इतका पाणीसाठा आहे.